पान:निर्माणपर्व.pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 अशाच मजकुराचे, पैसे घेणाऱ्यांची नासे वगैरे असलेले, इतर काही जणांनी लिहिलेले आणखी एक १।८।७० चे पत्र मंडळाच्या दप्तरात पडून आहे.

 अंबरसिंगनेही या प्रकरणी प्रांताला लिहिले--

 श्रद्धेय श्रीप्रांतसाहेब यांचे सेवेशी-
 अर्जदार : खाली सह्या करणारे अनाथ आदिवासी बांधव आम्ही विनंती अर्ज करतो की जे पाडळदे येथील हद्दपार प्रकरण अंतिम निर्णयासाठी आपणाकडे आलेले आहे त्याबाबत पाडळदे येथील गुजर लोकांचे म्हणणे आहे की लाख रुपये लागले तरी चालेल. आम्ही प्रत्येकी २०।२० हजार रुपये करून देऊ. परंतु आपल्या हद्दपार होणाऱ्या लोकांना हद्दपार जाऊ देणार नाही. संबंधित ऑफिसरना पैसे देऊन आम्ही ही case निर्दोश काढून घेऊ. अशा प्रकरणी गंभीर तीव्र चरचा पाडळदे गावात सजातीय गुजर लोक करीत आहेत. याप्रकरणी जातीने लक्ष घालून अशा प्रकारच्या ज्या अफवा असतील त्याचेवर अमल करण्याची कृपा करावी.
 आम्हा गरिबांना परत धास्ती वाटत आहे. कोठे अधिकारी मायबाप पैसे खाऊन आमचे हाल करण्याची त्यांची इच्छा असेल तर त्यांनी अवश्य करावी. आम्ही त्याच्याच फांद्या आहोत. आपल्या बद्दलची खोटी नालस्ती होऊ नये. जे जे लोक बोलतात ते आपल्या निदर्शनास आणून देणे आम्ही गरिब आदिवासी जनतेचे आद्य कर्तव्य मानतो.
 या प्रकरणी आपण कृपावान सरकार, या निर्वासित आदिवासी जनतेवर होणाऱ्या त्रासाला दूर करण्यासाठी आपल्या प्रभावी शक्तीची गरज आहे. योग्य व अचुक co-operation व मार्गदर्शन करून आमची केस तडीस लावाल ही विनंती आहे. आपण पैसे खाणार नाही अशी खात्री आहे. तरी या भेसूर परिस्थितीकडे पाहता भीती वाटते. योग्य ते करावे. आपण आम्हाला सांभाळून घ्याल ही विनंती. खोट्या आफवांना आम्ही भिणार नाही.

 सबंध वर्षभर अंबरसिंगाचा अशा स्वरूपाचा बराच पत्रव्यवहार थेट वरपर्यंत चालू होता.

 पण तत्पूर्वी ७० सालाला घडलेली आणखी एक घटना. त्याचे असे झाले-

 संस्थेसाठी जागा हवी होती.

 अंबरसिंगने नदीकाठची एक जागा हेरली. भिल्ल वसती या जागेपासून जवळ होती. वेळप्रसंगी सभा वगैरे घ्यायची तर नदीचे कोरडे पात्रही शेजारी मोकळे

शहादे । १९