प्रयत्न नसून नवीन पक्षाचा अपमान करण्याचाच पर्याय होता. त्यांनी टिळकांना अशा तऱ्हेच्या अटी सांगितल्या कीं, त्या बहुमतवाल्यांस पसंत पडत्या ना. गोखल्यांस आपण अल्पसंख्याक आहों हें या वेळीं माहीत होतें. असें असूनही त्यांनी खालील अटी घालाव्या ही गोष्ट अनुचित वाटते. त्या अटी अशा- (१) सभेच्या कार्यकारी- मंडळींत दोन्ही पक्षांचे सारखे सभासद असावे. (२) अध्यक्ष आहे तोच म्हणजे जुन्या पक्षाचाच असावा. (३) दोन सेक्रेटरींच्या ठिकाणीं या वर्षापासून तीन असावे, आणि त्यांतील दोन जुन्या पक्षाचे आणि एक नवीन पक्षाचा असावा. टिळकांचें महत्त्व दृष्टीआड व्हावें एतदर्थ हा प्रयत्न होता. हा प्रयत्न अर्थातच निष्फळ झाला. आतां टिळकांचे मताधिक्य होणार हें पाहून त्यांच्या जवळ काम करावे लागणार या भीतीनें हे रानडे पक्षाचे लोक सभा सोडून जाण्यास तयार झाले! आणि टिळकांस आयत्या बिळावर नागोबा असें म्हणूं लागले! परंतु आजपर्यंत सार्वजनिक सभेत आपले मताधिक्य नव्हते म्हणून टिळक दुसऱ्या सभा काढण्याच्या भरीस पडले नाहीत. पार्लमेंटमध्ये आपले मताधिक्य होत नाहीं म्हणून कोणी नवीन पार्लमेंट स्थापीत नाहीं, आणि नवीन येणाऱ्या मंत्रिमंडळास कोणी आयत्या पिठावर रेघा ओढणारे असे अपमानास्पद दूषणही देत नाहीं. टिळकांस मिळतें घ्यावयास नको असें म्हणणारे व हा कांगावा करणारे जे नेमस्तपक्षीय लोक त्यांसच खरोखर माघार घेणें, आपलीं मतें बहुमतापुढे मागें घेणें, कधीं माहीत नव्हतें. नबाबशाही त्यांस पाहिजे असे. ती दुसरी नोकरशाहीच होती; लोकशाही नव्हती, ही गोष्ट काँग्रेसच्या वेळीं सिद्ध झाली आणि या वेळेसही सिद्ध झाली.
जुनी सभा सोडून नवीन सभा स्थापण्यास आतां रानडेपक्षाचे लोक कारणे शोधूं लागले आणि ज्या नांवांनीं हिंदुस्थानच्या राजकीय चळवळींत खळबळ उडविली तीं नांवें जन्मास आली. टिळकपक्ष हा जहाल पक्ष आहे; आमचा पक्ष नेमस्त पक्ष आहे; दोघांचें जमणें अशक्य, म्हणून हा सवतासुभा आम्हांस काढणे भाग आहे असें या रानडे- पक्षाच्या लोकांनी जाहीर केलें. आजपर्यंत नेमस्तपक्षाचा वरचष्मा होता तेव्हां या अल्पसंख्याक पक्षानें आत्मघातकी, पक्षभेदाची चळवळ केली
पान:ना. गोखले चरित्र.pdf/८२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
नेमस्त नबाबशाही.
