Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
हरिभाऊ, येतो आतां !!!

जाण्यासाठी असते, तद्वतच झाले. आतां बोलण्याची शक्ति राहिली नाही. संध्याकाळी त्यांचे भाचे पोंक्षे हे तेथे आले. व गोपाळरावांची स्थिति पाहून ते एकदम बायकोसारखे रडूं लागले. रडणे गोपाळरावांस सहन होईना. 'रडावयाचे असेल, तर येथून निघून जा रे?' असे अवसान आणून गोपाळराव म्हणाले. हळूहळू सायंकाळ झाला. आयुष्याचाही सायंकाळ संपला. आता रात्रीस आरंभ झाला. सभोवताली मृत्यूची काळी छाया पसरून राहिली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर विषण्णता व खिन्नता स्पष्ट दिसत होती. उदासीनता व उद्विग्नता यांचं साम्राज्य सर्वत्र सुरू झालें होतें. एकेक क्षण, एकेक घटका, मोलाची जाऊं लागली. आतां आठ वाजावयास आले. ते पहा आठाचे टोले देण्यांत आले. आठाच्या टोल्यांनी जणूं आठवण झाल्याप्रमाणे मृत्यु अधिक पुढं सरकला!
 आठ वाजतां तब्येत अधिकच बिघडली. हरिभाऊंस निरोप पाठविण्यांत आला. ताबडतोब टांग्यांत बसून हरिभाऊ सोसायटीत आले. गोपाळराव अत्यवस्थ होते. परंतु त्यांस शुद्धि होती. बोलता येत होते. हरिभाऊंना पाहून त्यांस समाधान झाले. 'मला आतां अंथरुणावरून आरामखुर्चीवर बसवा, असे ते म्हणाले. दोघांतिघांनी त्यांस अलगत उचलून खुर्चीवर- त्यांच्या आवडत्या खुचींवर ठेविलें. त्यांनी सर्वास पोट भरून, डोळे भरून पाहिले! शेवटचेच पाहणें तें! नंतर ते क्षीण स्वराने म्हणाले, 'या लोकची मजा पाहिली, आतां तिकडे जाऊन पाहू! खुर्चीवर बसल्यानंतर पांचच मिनिटांनी त्यांनी वर आकाशाकडे बोट केले. तिकडे जातो असे या करण्यानें गोपाळरावांनी सुचविले. आपली मान हालवून 'हरिभाऊ येती आतां!' असे ते बोलले आणि त्यांनी नमस्कार केला व डोळे मिटले. किती शांत व गंभीरपणें त्यांनी इहलोकचा निरोप घेतला! कसेही झाले तरी थोर ते थोरच आतां मृत्युलोक संपला. जीवशिवांचे ऐक्य झाले. कुडीचा आणि आत्मारामाचा वियोग झाला. चैतन्यांत चैतन्य विलीन झाले. तेथील देखावा अत्यंत करुणास्पद होता. गहिंवर आणणारा होता. फत्तरास सुद्धा त्या वेळी पाझर फुटला असता; दगडाचें सुद्धां पाणी झाले असतं. कठेारवृत्तीच्या माणसाच्या डोळ्यांसही चटकन पाणी आलें असतें. रात्रीचे अकरा वाजलेले; सर्वत्र शांतता होती. आकाशांत