Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
लिहिणें अधिक खरें मानावें की बोलणें ?

त्या शब्दांची जबाबदारी येते. घरांत आम्ही वाटेल ते बोलूं. सरकारविरुद्ध सशस्त्र युद्ध पुकारावें असेंही म्हणूं. परंतु जर समाजांत मी हें बोलेन तर मी त्या बोलण्याबद्दल जबाबदार धरला जाईन. मनांतील मांडे पुष्कळ असतात, परंतु जबाबदारीनें जे लिहिले तेच खरें घेऊन चालले पाहिजे. गोखले याच्या अगदी उलट घेऊन चालले. जे लिहिले त्याच्यापेक्षां बोलणें जास्त खरे असे गोखले गृहीत धरून चालले. मनुष्याच्या स्वभावज्ञानासाठी, स्वभावाचे सम्यक् आलोचन करतांना त्याच्या बोलण्याला पुष्कळच महत्त्व देणे जरूर आहे. परंतु ही या मनुष्यांची मतें आहेत असे समाजांत सांगणे धार्ष्ट्याचे असून ते शहाणपणाचेंही होणार नाही.
 कांही असले तरी आमच्या प्रामाणिक व निःपक्षपाती मनास असेंच वाटते की या वादांत गोखल्यांवरच बाजू येते. गोखल्यांनी प्रो० विजापुरकरांत आणखी मध्ये ओढले आहे. प्रो० विजापुरकरही म्हणतात की सुब्बारावांजवळ टिळक असे बोलले असतील. परंतु ती मनाची दृश्य- सृष्टीत न येणारी कल्पनापत्यें काय कामाची? या मसुद्यांत काय आहे ते पहा. गोखले म्हणतात मला मसुदा पहावयास मिळाला नाहीं म्हणून मी सुब्बारावांजवळ जे भाषण झाले त्याच्यावरच विश्वसलों. परंतु हा मसुदा खुद्द गोखल्यांच्या घरी झाला असतां तो त्यांनी पाहिला नसेल हे संभवनीय दिसत नाही. प्रो० विजापुरकरांचे ज्ञानप्रकाशांत एक पत्र प्रसिद्ध झाले आहे. परंतु आमचा मुख्य मुद्दा त्याने खोटा ठरत नाहीं.


अखेर.

 गोखले यावेळेस आजारी होते. या भांडणांचा त्यांना जास्तच वीट आला असेल. त्यांनी हे सर्व सरळ दृष्टीने केले असेल; पुढे धोके येऊ नयेत म्हणून केले असेल; परंतु त्यायोगें नुकत्याच कष्टद स्थितीतून आलेल्या वीराचं हृदय दुखविले गेले आणि गोखल्यांच्या अनुयायांनी तर क्रौर्याची सीमाच केली. त्यांनी टीकेची परवावधि केली. टिळकांच्या