आतां गोपाळराव हेच आधार होते. देशांतील बिकट परिस्थितीमुळे त्यांस चार अश्रु ढाळण्यासही फुरसत नव्हती.
पंजाबमध्ये असंतोषाच्या लाटा उसळत होत्या. कॉलनायझेशनचे बिल व लॅडॲक्विझिशन बिलांत दुरुस्ती करण्याचें बिल यांनी पंजाबांत फार खळबळ माजली. लोकांस संताप आला. सरकारने दडपशाहीचं सत्र सुरू केलें. लाला लजपतराय व अजितसिंग या दोन पुढाऱ्यांना अटक करण्यांत येऊन त्यांस शिक्षा झाली.
पंजाबमध्यें जमीनमहसुलामध्ये वाढ करण्यांत आली. बारीदोआब कालव्याच्या पाण्याचे दर वाढविण्यांत आले. याच सुमारास कॉलनायझेशन बिल पंजाब सरकारनें पुढे आणलें. परंतु लॉर्ट मिंटो यांनी या बिलास संमति देण्याचें नाकारलें. कालव्याच्या पाण्याचे दर वाढले तेव्हां आम्ही कर देत नाहीं असें जमीनदार म्हणूं लागले आणि सरकारनेही माघार घेतली. पंजाबांत असंतोष पसरविण्यास मुख्यतः जबाबजार जर कोणी असेल तर सरकारच्या पुठ्ठ्यांतील 'सिव्हिल आणि मिलिटरी गॅझेट' हेंच होय. हिंदुस्तानांतील सुशिक्षितांस शेलक्या शिव्यांचा अहेर करण्यांत या गॅझेटानें खरोखरच आघाडी मारली. 'बडबड्ये पदवीधर' (Babbling B.A.s), हलकट जातीचे (Base-born), निंदास्पद सुशिक्षित वीर (An unhonoured nobility of the school), दास (Serfs), रडतराव, (Beggars on horseback), अंत्यज वर्ग (Servile classes), कलंकित जात (A class that carries a stigma)- एक कां दोन हजारों गालिप्रदानें गॅझेट रोज देत होता. सर डेन्सिल बेट्सन यांच्याकडे पंजाबी लोकांनीं याबद्दल दोनदां अर्ज केले. परंतु या लिखाणाबद्दल खेद प्रदर्शित करण्यापलीकडे त्यांनी जास्त काय करावें अशी तुमची अपेक्षा आहे असे त्यांनी नक्राश्रु ढाळले. परंतु हिंदी पत्रांच्या मुस्कटदाबीस मात्र पारावार राहिला नाहीं. 'इंडिया' पत्रांत एक पत्र छापण्याबद्दल त्याच्या संपादकास- पिण्डीदास यांस पांच वर्षांची सजा समर्पण करण्यांत आली. छापणारा 'दीनानाथ' यास दोन वर्षे तुरुंगवासाच्या सुखाचा आस्वाद घेण्यास माबाप व न्यायनिष्ठुर सरकारनें पाठवून देलें. 'पंजाबी' पत्रानें वेठीस मजूर लावण्याच्या दुष्ट कृत्यावर टीका
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१८३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५१
'सिव्हिल अँड मिलटरी गॅझेट्चा शिवराळपणा.
