Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४७
लोकांस शिकविण्यास लागण्यापूर्वी स्वतः शिका.

मेकांस ओळख नसणे या तऱ्हेने पाऊल पुढे पडावयाचें नाहीं. एकाच विचाराचे, एकाच ध्येयाचे, एकाच उच्च मनोवृत्तीनें भारून गेलेले लोक जर देशसेवेचें कंकण करी बांधितील तर देशाची बरीच सुधारणा हां हां म्हणतां होईल. सामर्थ्य आहे चळवळीचें । जो जो करील तयाचें'- चळवळींत व संघटनेतच सामर्थ्य असतें. 'वन्हि तो चेतवावा रे, चेतवितांचि चेततो'- एकदां काडी लावून द्या कीं काम झालें! देशांतील अज्ञानाला प्रत्येकाने काडी लावावी कीं ज्ञानाचा उजेड आलाच. 'यत्नें तो देव जाणावा' हें समर्थांचें अमोल उपदेशवचन आपण डोळ्यांआड करून भागणार नाहीं. आणि समर्थांनीं ज्या गोष्टीवर विशेष जोर दिला ती गोष्ट ही कीं, 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे'- जसें सांगाल तसें वागा. उच्चाराप्रमाणे आचार असेल तर तुमच्या सांगीचा जास्त परिणाम होईल. प्रतिज्ञापत्रकांत या गोष्टीचा समावेश आहे. आधुनिक पद्धतीचा रामदासी पंथ गोपाळरावांनी निर्माण केला. या तरुणांचा शिक्षणक्रमही मोठ्या मार्मिकतेनें आंखला होता. ज्या शिस्तींतून गोखले स्वतः गेले तीच शिस्त इतर कार्यकर्त्यांस लावणें त्यांस इष्ट व जरूर वाटलें पांच वर्षे विद्यार्थ्यानें- देशसेवकानें सर्व प्रश्नांचा सांगोपांग अभ्यास करावा. आणि मग लेखणी व जिव्हा यांस चालना द्यावी. म्हणजे तो जें बोलेल त्याचा लोकांस विचार करावाच लागेल. कारण त्याचे लिहिणें व बोलणें भारदस्त व विचारार्हच असेल. बेझंट- बाई म्हणतात "For one thing, I would ask you specially to help this young society. It is because he demanded that everyone who came into it should study before he acted and should know before he spoke. Five years of silence be imposed on those who came to him before they might write or speak or try to guide their fellowmen and there he showed his wisdom and the secret of his power, for he never spoke save with knowledge behind speaking, and those who try to emulate his example must also learn before they begin to teach.' अशा रीतीनें तरुण सुशिक्षित करावयाचे. नंतर देशासाठीं, त्यांनीं सोसायटीच्या भिक्षा-झोळीतून जो घांस मिळेल