Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०
राजाच्या कर्तव्याची मीमांसा.

measure that they could take in an extremity, but against those officials of yours who are responsible for the unhappy situation that has been brought about.'
 कर्झन साहेबांच्या एकंदर धोरणाचे त्यांनी खालील वाक्यांत यथार्थ स्वरूप दाखविलें आहे. 'Let us cripple them once and all, so that they shall be incapable ever of rising.' सरकार संशयपिशाच्चानें कसें भारलें गेलें आहे, हिंदुस्तानांतील लोक आज राजनिष्ठ दिसले तरी पुढें मांगें कदाचित् ते अराजनिष्ट होतील या भीतीनें त्यांस आतांच तारेच्या कुंपणांत अडकवून टाकणें बरें ही सरकारची सैतानी व सुलतानी वृत्ति कशी उघड होते याचे गोखल्यांनीं यथार्थ वर्णन केलें. मुलगा मोठा झाल्यावर आपणास नीट वागविणार नाहीं या भीतीने लहानपणींच मुलाचे हातपाय कापून टाकण्यासारखें हें सरकारचें कृत्य आहे. परंतु या कृत्यानें लोक पुढे अराजनिष्ठ होण्याच्या ऐवजीं आजच असंतोषाने धुमसू लागतील. पुढे मुलानें आपणास चांगले वागवावें अशी बापाची इच्छा असेल तर बापानें त्या मुलाचें खरें कल्याण केलें पाहिजे. त्याला उत्तम शिक्षण दिलें पाहिजे. त्यास पोटास मिळविण्यास शिकविलें पाहिजे. त्याप्रमाणेंच सरकारनेही, जर प्रजेची निष्ठा सरकारास पाहिजे असेल तर, प्रजेस सुशिक्षित केलें पाहिजे, तिचें खरें खरें कल्याण केलें पाहिजे, पोटापाण्यास प्रजेस मिळतें कीं नाहीं आणि पुढे मिळेल कीं नाहीं इकडे लक्ष पुरविलें पाहिजे. तरच प्रजा दुवा देते. सरकारची विश्वासवृत्ति डळमळली आहे; तरी वेळींच सावध होऊन हिंदुस्तानांतील चालत आलेल्या कारभारास योग्य अशी कलाटणी द्या असे गोखल्यांनीं सर्वत्र सुचविलें. त्यांनीं जेथें जेथें व्याख्यानें दिली तेथें तेथें त्यांनीं हिंदुस्तानचा चित्रपट मोठा हृदयद्रावक रंगविला. कर्झन साहेबांची कारकीर्द म्हणजे व्याख्यानाला विषयांची तूट नाहीच, परंतु त्याशिवायही हिंदुस्तानांतील वाढतें दारिद्र्य, शेतकऱ्यांची कंगाल स्थिति, वारंवार पडणारे दुष्काळ, अज्ञानांधकारांत लोळणाऱ्या शेकडा नव्याणव अगर- जास्तच- लोकांस नोकरींत मज्जाव, या सर्व वृत्तांतानें त्यांनी श्रोत्यांची मनें थरारून सोडली. आक्टोबर ९ रोजी त्यांनी लंडनमध्ये 'हिंदूंच्या