दिसतो. पुरूषसत्ताक समाजाची अरेरावी, बाईला वस्तू म्हणून वापरताना मनातं शंकाही न येणारा समाज तसेच बाईचे अप्रश्न पिचत रहाणे या पुस्तकात दिसते.
रहाणीमानाचा गुणस्तर उंचावण्याची चर्चा आपण समित्यांच्या पातळीवर संतत करत असताना प्राणीपातळीवरचे जगणेही बाईसाठी अवघड होताना दिसते. हे सारे या लेखामधून मांडले गेले आहे. प्रारंभी म्हंटल्याप्रमाणे कुटुंब या सामाजिक संस्थेच्या मर्यादा जाणवतात. या कुटुंबाचे लोकशाहीकरण झाले पाहिजे. हेही जाणवते. पण संस्था हे सुद्धा एक विस्तारित कुटुंबच! त्यामुळे या प्रकारच्या संस्था चालवताना येणारे प्रश्न, कार्याच्या परिणामकारकतेच्या दृष्टिकोनातून त्यात होऊ शकणारे बदल याचीही चर्चा झाली असती तर उपयुक्त ठरले असते. शैलाताईंच्या पुढील लेखनात ते येईल अशी आशा आहे.
हा लेखसंग्रह वाचताना 'स्त्रीप्रश्न' अलग बेटावर ठेवून विचार करता येत नाही हेही जाणवते. समाजाचा समग्र विचार केल्याशिवाय, जगण्याच्या पोताचा विचार केल्याशिवाय स्त्रीच्या सन्मानाने जगण्याचे प्रश्न उमजत नाहीत. म्हणून तर 'विशिष्ठ प्रकरण' समजावून घेताघेता बृहत् प्रश्नाकडे डोळसपणे जायला हवे.
या प्रस्तावनेच्या निमित्ताने शैला लाहिया यांना त्यांच्या पुढील लेखनासाठी आणि 'दिलासा' मधील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
पुष्पा भावे