पान:तिच्या डायरीची पाने.pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बसलीस तर पोरीचं जीवन बी नासून जाईल. जरा शानी हो. दिलासात आलोय आपन. नामी संधी मिळाली. तिचा फायदा घे नायतर तुझ्या माझ्यासारख्या कितीतरी बाया ढोराच्या मौतीनं मरताहेत.... चल लाग कामाला!"
 अशा या शांताने आपल्या मोठ्या बहिणीचे घर पूर्णपणे बदलून टाकले. राहीवाई खूप कष्टाळू. नवऱ्याला सतराशे रुपये पगार असला तरी तो सारा दारूतच जाई. दोन मुलं मुकी. दोन वेळेला हातातोंडची गाठ पडण्याची मारामार असे. शांतूने मुलांना शाळेत घालायला लावले. मुक्या मुलाचे नाव मूकबधिर विद्यालयात घालायला लावले. मुकी भाची शिवण शिकायलाही येत असे. वालसदनच्या मुलांची माया करतांना ती त्यातच रमत असे. एक दिवस आमच्याकडे लोणावळ्याहून पत्र आले की तेथील बालग्राममध्ये माता हवी आहे. शांतू जाण्यास उत्सुक होती. पण ना लिहिता येतं की वाचता येतं. मग हिशेब कशी लिहिणार? तरीही आम्ही तिचे नाव पाठवले आणि तिची निवडही झाली. जाण्यापूर्वी तिच्या नवऱ्याविरुद्ध केलेली केसही जिंकली. पण शेवटी तिलाच त्याची कीव आली. त्याने शांतूला भरपाई म्हणून अवघे पाच हजार रुपये दिले. कायदेशीररित्या शांतू वेगळी झाली. तिचे म्हणणे असे, "त्या गाडवाने तिलाबी फशिवलंच की. मी तिला कसा दोस देऊ? तिचं लगीन तिच्या भावानं लावलं. मला न का मिळेना सौंसार कराया. तिने तरी लग्नाची बायकू म्हणून राहावं. तुमीच सांगितलं न्हवं? की पयल्या लग्नाची बाईच खरी बायकू असते. दुसरीला ठिवलेली म्हनतात. भलेही द्येवासमूर हार घातले असतील, मी सोडचिठ्ठी मान्य केली तर तिचं लगीन खरं मानतील नव्हं? मी मायबाप नसलेल्यांचा सौसार करेल. मायवापाविना वाढनाऱ्या लेकरांची माय होयाला आवडल मला."
 शांतू लोणावळ्याच्या आंतरभारती बालग्राममध्ये खूप चांगल्या रीतीने राहिली. गेल्या दोन तीन वर्षापूर्वी त्यातील एकाने भाज्याला बालग्राम सुरू केले आहे. त्या बालग्राममध्ये शांतू केवळ 'बालसदनमाता' म्हणून काम करीत नाही तर त्या संस्थेच्या कार्यकारिणीची ती सन्माननीय सदस्या आहे. तीन वर्षापूर्वी आदर्श सदनमातेचा पुरस्कारही तिला मिळाला आहे.

 राहीबाईचा दारूडा नवरा आता या जगात नाही. राहीच्या मूकबधिर मुलाला पनवेलच्या मूकबधिर विद्यालयात घालण्याचे काम शातूने केले. उरलेल्या

शांतू
२७