पान:तिच्या डायरीची पाने.pdf/१२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गिळले. तिघी वहिन्या आणि नऊ भाचरेही जमिनीत गडप झाली. आता दोघा भावांची लग्ने झाली आहेत. वाळाच्या मृत्यूची भरपाई पंचवीस हजार रुपये नावावर जमा झालीय. त्या पैशाची आठवण सुद्धा नको वाटते. भाऊ म्हणतात, "आमच्यात वाईचं लग्न एकदाच होतं. डागाची बाई कोणीच पत्करत नाहीत. आमी ते वंगाळ मानतो. आता आमचा संसार नव्याने सुरू झालाय. पण बहिणीकडे पाहिलं की तोंडाची चव जाती. तुमी तिच्यासाठी काही बघा. लगीन नाही पण शिवन अगर काही धंद्यासाठी शिक्षण द्या." भूकंप झाल्यानंतर त्यांचं शेत पेरून देतांना मी विनंती केली होती की तिशीही न ओलांडलेल्या, टाकलेल्या बहिणीला शिवण क्लासला पाठवा म्हणून. पण तेव्हा नकार दिला होता. "तीन भावांच्यात एका बहिणीची काय ती अडचण? आमी खाऊ ते ती खाईल. आमच्या चुलीलाही आधार" असे उत्तर मिळाले होते. पण आता जग बदलते आहे.
 भूकंप होऊन सहा वर्ष झाली. अशीच वर्षे पुढे सरकतील. दर साली लक्ष्यांचा सण जखमांच्या खपल्या सजवून, दारी येत राहील. भूकंपाने हिबाळून टाकलेल्या… उतरवून टाकलेल्या लक्ष्म्यांना त्यांची सन्मानाची जागा पुन्हा कधी भेटणार? आणि अशा हिबाळून टाकलेल्या लक्ष्म्या काय फक्त भूकंपच निर्माण करतो का?


हिबाळून टाकलेल्या लक्ष्म्या
१२१