" चित्रा, चालवते का ? ऊठ, " पिता म्हणाला. हळुइळू तो बंगलीत आली. केस तिने एका हाताने साफ केले. कोपर दुखत होते. तिला रडू आले.
" हे काय ! रडतेसशी ? अग उंदीर पळाला ! इतके काही नसेल हो लागले. घरी जायचे का ? " बापाने विचारले.
" आता मी जरा पडत्ये. "
" पड तर मग. "
चित्रा झोपली. थोड्या वेळाने खरोखरच तिला झोप लागली. बळवंतराव, जहागीरदार, चारू पत्ते खेळत होते. खेळता खेळता बळवंतराव एकदम मोठ्याने हसले. चित्रा जागी झाली, तो उठली.
"नीज़ की जरा." बाप प्रेमाने म्हणाला.
"तुम्ही मात्र खेळणार नि मी निजू वाटते ? "
“ तुला लागले ना आहे ?"
“तुम्हीच ना म्हणालेत उंदीर पळाला ? काही नाही लागले. मी येते खेळायला. पाच पानी हुकमाचे खेळू. कोण कोण भिडू ?"
" आम्ही म्हातारे एका बाजूला, तुम्ही दोघे एका बाजूला. "
"चालेल का हो तुम्हाला ?" चित्राने चारूला विचारले.
"मोठ्यांचे ऐकलेच पाहिजे." तो हसून म्हणाला. खेळ सुरू झाला. चित्रा व चारू यांच्याकडेच सारखा डाव यावयाचा. चित्राला हसू आवरेना.
"बाबा, तुम्हाला काही कसा येत नाही डाव ?"
"अग, ज्यांचे लग्न व्हायचे असते ना, त्यांच्याकडे डाव येतो." बळवंतराव म्हणाले.
"यांचे व्हायचे आहे वाटते लग्न ?" तिने हसून विचारले.
"आणि तुमचे जसे व्हायचेच नाही ! " चारूही हसून म्हणाला.
"तुमचे दोघांचे लग्न केव्हा तरी होईलच. आज ना उद्या तूही करशील, तूही करशील." बळवंतराव म्हणाले.
"बाबा, कोपर दुखते आहे हो, " ती म्हणाली.
"घरी गेल्यावर आयोडाईन लावीन हो."