पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कै० जनार्दन बाळाजी मोडक, बी. ए. पूर्वी एका प्रसंगी श्रीसमर्थाच्या एका सच्छिष्येचें त्रोटकसें चरित्र लिहि. ण्याचे काम जरी एक्या परी अभिनंदनीय तरी बहुता परी दुःखकर असें आह्मांकडे आले होते. तें कसें तरी केले. परंतु आज समर्थाच्या एका सच्छिष्याचें चरित्र लिहिण्याचे सर्वतोपरी दु:खकर असें काम करावे लागत आहे, त्या योगाने आमचे मन व लेखणी ही दोन्हीही कर्तव्यपराङ्मुख होऊ पाहत आहेत. अशी त्यांची स्थिति व्हावी हे अगदी साहजिक आहे. 'परदुःखेन दुःखिता विरलाः' ही सत्कव्युक्ति खरी असल्यामुळे त्या सच्छिष्यविषयी लिहितांना मनाची स्थिति आजच्या इतकी उद्विग्न झाली नव्हती. याचे कारण, सौ. आनंदीबाईंच्या अकालिक मृत्यूने आपल्या सर्व देशाचे नुकसान झाले, व देशाबरोबर परोक्षतया व अंशत: आमचेही नुकसान झाले, किंवा जो काही फायदा पुढे होईल अशी बळकट आशा होती तिचा तंतु तुटून गेला. तेव्हां नुकसानीच्या भाराचा कांहीं अंश आह्मांस सोसावा लागला ह्मणून त्या मानाने आमच्या मनाला उद्विग्नताही कमी भासली. परंतु आजच्या आमच्या चरित्रनायकाच्या संबंधाने नुकसानीचा सर्व भार विविधज्ञानविस्तार व त्याचे काही व्यवसायबंधु व भगिनी यांजवर आहे. व देशास व विशेषतः महाराष्ट्रभाषेस जी प्रचंड हानि झाली आहे ती देखील आह्मां ( विविधज्ञानविस्तार व इतर बंधुभगिनी ) मार्फत. तेव्हां आज आमचें मन अत्यंत उद्विग्न व्हावे यांत अगदी नवल नाही. त्यांतून मोडक यांचा विविधज्ञानविस्तारावर आज सोळासत्रा वर्षांचा अत्यंत प्रेमा होता. तो इतका की, त्यांच्या स्वकीय अर्भकावर (काव्येतिहाससंग्रहावर ) देखील त्यांचा लोभ फार कमी होता. इतका अकृत्रिम व अहेतुक लोभ विविधज्ञानविस्तारावर मोडकांचा कां व कसा जडला, याची मीमांसा होणे फार कठिण आहे. आमच्या मते तर केवळ मोडकांचा उदार स्वभाव याला कारण आहे. 'कळवळ्याची जाती। लाभावीण करी प्रतिी।' हे या लोभाचें मूळ बीज असावें असा आमचा ग्रह आहे. विविधज्ञानविस्तार देखील मोठा भाग्यशाली आहे हेही या लोभाचे कारण असावें. कोणतेही कारण असो, विविधज्ञानविस्तारावर मोडकांची कृपादृष्टि निरपेक्ष, अकृत्रिम व अत्यंत होती ही गोष्ट निर्विवाद आहे. या गोष्टीचे प्रत्यंतर पहाण्यास विविधज्ञानविस्ताराच्या सहाव्या पुस्तकापासून आजच्या अंकापर्यंत बहुतेक अंक साधनीभूत होतील. विविधज्ञानविस्ताराला त्याचे