________________
कै. सौभाग्यववती डाक्टर आनंदीबाई जोशी. १७ घेतली, मनाचे श्लोकांपैकी दहा पांच श्लोक पाठ केले, व 'जय जय रघुवीर समर्थ' ह्मणून ललकारलें, ह्मणजे मनुष्य रामदासी किंवा समर्थांचा शिष्य झाला असें नाही. महाराष्ट्रांत, विशेषत: साताऱ्याच्या आजूबाजूस, तसले शिष्य पायलीचे पंधरा मिळतात. परंतु दासबोधांतच शिष्याची लक्षणे सांगितली आहेत. तशा प्रकारचा जो असेल तोच 'समर्थांचा शिष्य' या पदवीस योग्य होय. जो आपल्या वागणुकीनें, आचरणाने व कृतीनें जो उपदेश घेतला असेल त्याची सार्थकता करून दाखवील, तोच सच्छिष्य. या जगांत चांगला पदार्थ फार थोडा आणि ह्मणूनच त्याची किंमत फार. त्याच मानानें सच्छिष्यही फार कमी. आणि ह्मणूनच त्यांचे विमल यश अजरामर राहते. नाही तर, ज्यांच्या येण्याचा हर्ष नाही आणि जाण्याचा खेद नाही, असल्या शिष्यांची लाखोली वाहायाची असली तरी देखील तितके शिष्य मिळण्यास अडचण पडणार नाही. असो. आपल्या उपदेशाप्रमाणे वागणारे कांहीं सच्छिष्य उत्पन्न होतील असें समर्थास खास वाटले असावें. परंतु महाराष्ट्रांतील स्त्रियांपैकी एकतरी आपल्या उपदेशाप्रमाणे सर्वस्वी वागून आपल्या हताश देशाचे पांग फेडण्याकरितां तीन हजार कोसांवर परमुलखांत जाऊन विद्यासंपादन करून येईल, उत्कट कीर्ति उरवील, व कांहीं एक चटक लावून सोडील, व ती आपली 'सच्छिष्या ' ह्मणवून घेण्यास योग्य होईल, असे हा वरील उपदेश लिहितेवेळी समर्थाचे मनांत तरी आले असेल काय ? खचित आले नसेल. असे विचार येण्यास समर्थाच्या काळची स्त्रियांची स्थिति अनुकूल नव्हती, व अजूनही नाही. तथापि जर आज समर्थ जीवंत असते तर ज्याप्रमाणे ' शिवबा ' ची कृत्ये, गुण व भक्ति ही मनांत येऊन व त्याचे उपदेशानुरूप वर्तन पाहून ते पुलकितगात्र व आनंदाश्रपरिप्लतनेत्र होत असत, त्याप्रमाणे या देशांत आणि परदेशांत जागत असलेल्या या सच्छिष्ये' च्या अपूर्व व अलौकिक गुणसमूहाकडे पाहून त्यांची खचित स्थिति झाली असती. समर्थाचे जे खरे शिष्य आहेत-नुसते नामधारी व वेषधारी नव्हत-ते आपल्या ह्या गुरुभगिनीचे अपूर्व व स्तुत्य चरित्र पाहून गवरहित होत्साते मन:पूर्वक तिचे धन्यवाद गाताहेत. आतां कोणी ह्मणतील-व त्यांचे ह्मणणे खरे आहे की आपल्या हिंदु समा. जांत गुरूपदेश घेण्याचा संप्रदाय बहुतेक जातींत पुष्कळ फैलावला आहे, व