१०५
"त्या माझ्या पतीच्या चिंतनांत व सद्गुरु विरक्तीच्या सहवासांत या देहाचें
सार्थक करावयाचें, हा माझा कृतसंकल्प आहे; तेव्हां आतां माझ्यासाठीं तूं
उगीच को आपला वेळ घालवितोस ? तूं आपल्या राजधानीस जा. मजपेक्षाही
चांगली अशी तुला पत्नी मिळेल. तूं तिजर्शी खुशार आनंदानें संसार कर.
मी लग्न करावें अशी परमेश्वराची मला आज्ञा नाहीं. मी हा असाच जन्म घाल-
वाचा अशी त्याची इच्छा आहे, हे मी तुला सांगितलेच; तेव्हां त्याच्या इन्
प्रमाणेच मी वागावें हे योग्य आहे.
स्वरूपसिंह - पण ज्याने आजपर्यंत बहुतेक आपले आयुष्य तुझ्या सहवास
घालविलें तो मी दुसऱ्या स्त्रीशीं विवाह करून सुखी होईन काय ?
लावण्यवती-तूं मानलेंस म्हणजे सुख होईल. सुखदु:ख हे केवळ मानण्या-
वर आहे.
स्वरूपसिंह – पण तसा मला अनुभव आला पाहिजे.
लावण्यवती-अनुभव घेऊन पाइा !
स्वरूपसिंह – मी आजपर्यंत तुजवांचून अन्य स्त्रिया मातेप्रमाणे मानल्या
आहेत, तेव्हा मला दुसरी स्त्री कशी करितां येईल ?
लावण्यावती– मी तर जगांतील सर्वच पुरुष पित्याप्रमाणे व बंधूप्रमाणे
मानले आहेत. तेव्हां मग कसा विचार ?
स्वरूपसिंहास या उत्तराने काय बरे वाटले असेल ? आजपर्यंत मोठमोठया
मनोराज्याच्या इमारती त्यानें उठविल्या होत्या व त्यांच्या अगदीं उंच शिख
रावर आरूढ होऊन तो भावी सुखाने आनंद पावत होता. यत्नाने आपली
प्रिया खास वळेल अशी त्यास मोठी आशा होती; परंतु तो सर्व एकदम
लयास गेली. तो त्या हवेंत बांधलेल्या राजवाड्याच्या शिखरावरून एकदम
खाली पडला व निराशारूप नदीत सांपडून विचारा गटंगळ्या खाऊं लागला !
कांहीं वेळ स्तब्ध वसल्यावर तो पुन: म्हणाला: – 'लावण्यवती, शेवटीं झालाच
का तुझा निश्चय कायम ?
लावण्यवती - ( शांतपणे ) हो !