पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना \o पूर्ण झाला असे म्हणतां नाही. कारण मोक्ष व नीतिधर्म याचीं तत्त्वें गहन असून त्यांसंबंधानें अनेक प्राचीन व अर्वाचीन पंडितांनी इतकें विस्तृत विवेचन केले आहे की, फाजील संचार जाऊं न देतां त्यांतील कोणत्या गोष्टी या लहानशा ग्रंथांत घ्याव्या याचा योग्य निर्णय करणें पुष्कळदां कठिण पडतें. पण महाराष्ट्रकविवर्य मोरोपंत यांनीं वर्णिल्याप्रमाणे कृतान्तकटकाऽमल ध्वज्-जरा देिर्लो लागली । पुरःसर-गदां सर्षे झगडतां तनू भागली ॥ अशी आमचीहि सध्यां स्थिति झाली असून संसारांतील सहचारीहि पुढे निघून गेले. यासाठा आपल्याला उपलब्ध झालेली माहिती, व सुचत आलेले विचार आपण लोकांस कळवावे, कोणी तरी ‘समानधर्मा' सध्यां अगर पुढे निघून ते पुरे करील, अशा समजुतीनें हा ग्रंथ आतां प्रसिद्ध केला आहे. सांसारिक कमें गौण किंवा त्याज्य ठरवून ब्रह्मज्ञान,भक्ति, वगैरे नुस्त्या निवृतिपर मोक्षमार्गाचेच गीतेंत निरूपण केलेले आहे, हें मत जरी आम्हांस मान्य नाहीं, तरी मोक्षप्राप्तीच्या मागीचे भगवद्गीतेंत मुदलीच विवेचन नाही,असेंहि आमचे म्हणणें नाहीं, हें आरंभींच सांगणें जरूर आहे. किंबहुना प्रत्येक मनुष्यानें शुद्ध परमेश्वरस्वरूपाचे ज्ञान संपादन करून तद्द्वारा आपली बुद्धि होईल तितकी निर्मल व पवित्र करणे, हें गीताशास्राप्रमाणे त्याचे जगांतील पहिलें कर्तव्य होय असें आम्हींहि या ग्रंथांत स्पष्ट दाखविलें आह. परंतु हा गीतेंतील मुख्य मुद्दा नव्हे. युद्ध करणें हा क्षत्रियाचा धर्म असला तरी उलटपक्षीं कुलक्षयादि घोर पातकें घडून जें युद्ध मोक्षप्राप्तिरूप आत्मकल्याणाचा नाश करणार तें करावें का करूं नये, अशा कर्तव्यमोहांत युद्धारंभं अर्जुन पडला होता. म्हणून तो मोह घालविण्यासाठीं शुद्ध वेदान्तशास्राधारें कर्माकर्माचे व त्याबरोबरच मोक्षोपायाचेहि पूर्ण विवेचन करून, आणि कर्मे कधीच सुटत नाहीत व सोडूहि नयेत असें ठरवून, ज्या युक्तीनें कर्मे केली म्हणजे कोणतेंच पाप न लागतां अखेर त्यानेंच मोक्षहि मिळतो, त्या युक्तीचे म्हणजे ज्ञानमूलक व भक्तिप्रधान कर्मयेोगाचेंच गीतेंत प्रतिपादन आहे, असा आमचा अभिप्राय आहे. कर्माकमीच्या किंवा धर्मीधर्माच्या या विवेचनासच आधुनिक केवळ आधिभौतिक पंडित नीतिशास्र असें म्हणतात. हें विवेचन गीतेंत कोणत्या प्रकारें केलें आहे हें सामान्य पद्धतीप्रमाणें गीतेवर श्वलोकानुक्रमानें टीका करून दाखवितां आले नसतें असें नाहीं. पण वेदान्त, मीमांसा, सांख्य, कर्मविपाक किंवा भक्ति, वगैरे शास्रांतील ज्या अनेक वादांच्या व प्रमेयांच्या आधारें कर्मयोगाचे गीतेंत प्रतिपादन केलेलें आहे, व ज्याचा उल्लेख कधी कधी फारच संक्षिप्तरीत्या केलेला असतो, त्या शास्रीय सिद्धान्तांची अगाऊ माहिती असल्याखेरीज