पान:केकावलि.djvu/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. १२९ असेल मनि; आमुची तुज कशास रे काळजी ?' । हट्ट. माझा उद्धार करावा हा जो कवीचा हट्ट तो. 'खोटा आरोप' असा जो 'आळ' शब्दाचा दुसरा अर्थ आहे त्याचाही पंतांनी ८ व्या केकेंत उपयोग केला आहे. १. आमची. परमेश्वराची काळजी (परमेश्वराला धांवतांना श्रम होतील ही काळजी). २. मोरोपंत कवीला. ३. ह्या संवोधनाने देवाची व भक्ताची अत्यंत सलगी दाखविलेली आहे. देवभक्तांची सलगी:-'एकमेवाद्वितीयं ब्रह्म' ह्याचा अनुवाद करणाऱ्या महाराष्ट्र भक्तमंडळांच्या काव्यांत देवभक्तांची फार सलगी वर्णिली आहे ती कित्येकांच्या मतें दूषणीय आहे. या संबंधाने 'निबंधमाले'त चर्चा केली आहे. त्यांतील महत्वाचे मुद्दे सारांशरूपाने येथे घेतले आहेत. (१) निबंधमालाकारांचा अभिप्रायः- केकावलीच्या संबंधाने आमच्या महाराष्ट्रकवीवर असा टपका आहे की त्याने सर्व विश्वाचा नायक जो परमेश्वर त्याच्यापुढे भयभीत होऊन जावयाचें व आपल्या अपरिमित क्षुद्रत्वास्तव वर मान करण्याचेही धैर्य न होऊन त्याने पुरतें ब्रही काढूं नये, ते सर्व गुंडाळून ठेवून त्यानें परमात्म्याशी खुशाल हवी तितकी सलगी किंबहुना हास्यविनोदही केला आहे.' यासंबंधानें कवीच्या तर्फे काही गोष्टी सांगता येतील असे सांगून शास्त्रीबोवांनी वरील आक्षेपास उत्तर दिले आहे. त्या गोष्टी अशाः-(१) 'कवीस मागील काळाचा फायदा द्यावयाचा होता.' ज्या काळी पंतांनी 'केकावलि' रचिली त्या काळच्या आचारविचारांचे प्रतिबिंब त्यांत वठल्यास तो दोष कविप्रतिभादर्शाचा नसून त्या काळच्या आचारविचारांचा पटला पाहिजे. (२) 'कवीची ईश्वराच्या विषयींची समजूत व अलिकडच्या लोकांपैकी काहींची समजूत ह्या परस्पर भिन्न आहेत. तेव्हां कवीचे वर्णन त्यांस न आवडल्यास त्यांत कवीचा दोष नाही.' इंग्रेजी चिताऱ्याने व एखाद्या जुन्या हिंदु चिताऱ्याने जर स्त्रीपुरुषांच्या जोडप्यांची चित्रे काढली तर त्यांत त्यांच्या स्त्रीपुरुषविषयक समजुती भिन्न असल्यामुळे मोठा फरक पडेल. पण त्यांची परीक्षा त्यांच्या त्यांच्या लोकांच्या रुचीप्रमाणे केली पाहिजे. तद्वत् आमच्या कवीच्या हृदयांत ईश्वराचे स्वरूप ज्या रीतीचे लहानपणापासून ठसले होते त्या रीतीचीच त्याची तजबीर त्याच्या काव्यांत उठली.' अलिकडच्या काळांतील लोकांस आवडे अशा प्रकारच्या चित्राची त्याजपासून अपेक्षा करणे हे योग्य होणार नाही. (३) 'मनुष्य हा ईश्वरापुढे अत्यंत क्षुद्र हे खरे; पण तसेंच हेही खरे आहे की, त्याचा उत्पन्नकर्ता व जनकही तोच. तेव्हा देवापुढे कितीही 'लुब्रे'पणा केला असला, तरी त्याचा अपराध झटला ह्मणजे बापापाशी सरपणा केल्याप्रमाणेच होय. हा पुत्रजनकभाव कवीने प्रस्तुत काव्यांतील कित्येक रस रीतीने वर्णिला आहे'. (४) 'काव्याची परीक्षा जी करावयाची ती रसिकजन च्या खरेखोटेपणावर तादृश करीत नसतात. केवळ अपसिद्धांतांचे ज्यांत प्रतिआहे. व ज्यांत सत्याचा लवलेशही नाही, असें काव्य केवळ अमोलिक असू शकेल; मात गाळण्यांतून काढलेले निवळ सत्य ओतप्रोत भरलेले आहे असलेही काव्य का असेल'. प्रत्यक्ष भर्तृहरीने व्याकरणावर ना सद्धां विचारूं नये अशा वसुलाचे असेल'. प्रत्यक्ष भर्तृहरीने र या आहेत त्यांत रस अगदीच अल्प आहे. 'तीच मोठमोठ्या काव्यांची टकांची सर्वांची कथानकें केवळ कल्पित असतात पण इतके असूनही कवित्व पद्यांत आणि ज्यांत सात गाळण्यांतून काढलेले निवळ सत्त कोण ततात पा कारिका रचल्या आहेत त्यांत रस अगदीच अल्प आदेर गोष्ट पहा; त्यांतील बहुधा सर्वांची कथानकें केवळ कल्पित असत