अयोध्या शहर हे दोन वेळां स्वर्गास गेले आहे व आणखी एकवार
जाणार आहे, ह्याकरितां पुष्कळ बैरागी लोक येथें वास करितात. येथे मोठ-
मोठ्या साव सावकारांची व राजे रजवाड्याची पुष्कळ अन्नछत्रे आहेत. येथे
पंडित उमेदत्त महाराज म्हणून महा विद्वान वृद्ध पंडित आहेत.
ह्यांची ह्या प्रांती मोठी मान्यता आहे व ह्यांस सालांतून सरासरी
उत्पन्न २५ हजारांचे आहे. ह्या पंडित महाराजांच्या दर्शनास
आम्ही गेलो होतो. आमचें आदर तार्तम्य ह्यान चांगले केले.
ह्यांस अबालवृद्धार्शी भाषण करण्याचा कंटाळा नाहीं. हे स्वभावान
फार सुशील आहेत. ह्यांचा विद्यार्थी पढविण्याचा आणि त्यांचे पो-
टास घालण्याचा मोठा अस्करा आहे. ह्यांचे वय सत्तरीच्या जवळ
जवळ आहे असे आम्हास वाटले.
येथील देवालयांच्या इमारती सर्व दगडी असून लाखो रुपये
खर्चाने झालेल्या आहेत. येथे राजा मानसिंगाने एक शिव मंदिर
बांधिले आहे. त्यास फारच खर्च लागलेला आहे. त्याच राजाने
येथे शरयू नदीच्या काठ स्वर्गद्वार म्हणून जागा आहे म्हणजे
ज्या द्वारानें श्री रामचंद्रानी अयोध्या स्वर्गास नेली तेथे त्याच राजा
मानसिँगाने सुमारे २ कोट रुपये खर्च करून घांट व देवालये
बांधलेली आहेत. ती पाहण्यासारखी आहेत.
येथे प्रयमतः गांवांत शिरतांना हनुमान गढी आहे. तीत श्री
मारुतीचे संस्थान आहे. येथील मारुतीची मूर्त बसलेली आहे.
ह्याचे कारण लोक असे सांगतात की, श्री रामचंद्रानी जेव्हां अयो-
व्या स्वर्गास नेली तेव्हां तेथील राज्य श्री मारुतीस देऊन त्या
गादीवर त्यांची स्थापना केली. आणि त्यास सत्तारूढ होण्याविषयों
आज्ञा दिली म्हणून मारुतीची मूर्त वसलेली आहे. बाकी हिंदुस्था
नांत कोणत्याही मारुतीच्या देवालयांत मारुती बसलेले आढळत
नाहीत. येथे हनुमान गढीच्या नजीकच श्री रामचंद्राच्या राजवा-
ब्याचे स्थान आहे. येथे ज्या कांहीं इमारती आहेत त्यांजविषयों
लोक अशी कथा सांगतात की, श्री रामचंद्रानी अयोध्या स्वगीत
पान:काशीयात्रा.pdf/३६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३
५
