पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वरील सर्व अनुभवांतून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जग निसर्ग जपते पैशापेक्षा शहाणपणातून! ज्या देशास दीर्घजीवी विकास योजना आखावयाची असते त्याचा आधार असतो निसर्ग साधन, संरक्षण व विकास. आपण याचा साधा विचारपण करत नाही. निसर्ग जपणे म्हणजे असते आयुष्यवर्धन व अर्थवर्धनही! सोन्याची कोंबडी पुरवून वापरणे... रोज अंडे घेण्याची समज जपणे, शहाणपण असते. ते आता अंगी बाणायलाच हवे. अन्यथा 'याचि देही याचि डोळा मरण अनुभवणे... सर्वस्व गमावणे'.

■■

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१५८