आहे, स्पस्ष्ट समोर जगाच्यापुढे आहे. त्यांत गूढता नाहीं. असष्टतंत तें लपेटलेलें नाहीं. त्यांच्या व्यक्तित्वाभोंवतीं पुराणं रचिलीं गेलीं नाहींत, दंतकथा गुंफिल्या गेल्या नाहींत.
आणि अरबस्थानांतील जमातीपाठीमागून जमाती नवधर्माच्या स्वीकारार्थ जसजशा येऊ लागल्या तसें मुहंमदांस वाटू लागलें कीं आपले अवतारकार्यहि समाप्त होण्याची वेळ आली. मक्केची शेवटची यात्रा करून यावें असें त्यांचे मनांत आलें. इ. स. ६३२ च्या फेब्रुवारीच्या २३ तारखेस ते निघाले. त्यांच्या बरोबर लाख दीड लाख यात्रेकरू होते. 'हजत अल-बलाघ' म्हणजे मोठी यात्रा असें हिला नांव आहे. किंवा 'हज्जत-उल-इस्लाम'- इस्लामची यात्रा असे साधे नांवहि आहे. मीनाच्या दरीत यात्रेचे सारे विधि त्यांनी केले. हे विधि उरकण्यापूर्वी ७ मार्च रोजी जबल-उल-अरफात या टेकडीवरून हजारों मुसलमानांसमोर त्यांनी शेवटचे प्रवचन दिलें. मुहंमद एक वाक्य उच्चारित. ते वाक्य खालच्या लोकांत असलेला पुन्हां उच्चारी. त्यावेळेस ध्वनिक्षेपक नव्हते. सर्वांना ऐकूं जावें म्हणून जिवंत ध्वनिक्षेपक उभे केले होते. तें साधे सरळ प्रवचन होतें.
"बंधूंनो, मी आज सांगतों तें ऐका. कारण आणखी एखादें वर्ष मला लाभेल असें वाटत नाहीं. या जागीं पुन्हां तुमच्यांत मी दिसेन, वावरेन, बोलेन असें वाटत नाहीं. हा आजचा दिवस व हा महिना जसा सर्वांना पवित्र वाटतो, त्याप्रमाणें सर्वांचे जीवन व मालमत्ता पवित्र माना. तुम्ही एकमेकांचे जीवन पवित्र माना. एकमेकांना सांभाळा. ईश्वरासमोर जाण्याची वेळ येईपर्यंत असे प्रेमानें व बंधुभावानें वागा. कोणाच्या प्राणांचा वा घरादारांचा नाश नका करूं. एके दिवशीं ईश्वराच्या न्यायासनासमोर उभे रहावयाचें आहे, हे कधींहि विसरू नका. त्या दिवसाची नेहमीं आठवण ठेवा. तेथें सर्व कृत्यांचा झाडा द्यावा लागेल.
"मित्रांनो, पतीचे पत्नीवर कांही हक्क आहेत, तसेच पत्नीचेहि पतीवर आहेत. आपल्या बायकांना प्रेमानें व सहानुभूतीनें वागवा. कठोर नका होऊ. दयाळु रहा. तुम्ही ईश्वराच्या जामिनकीवर आपल्या पत्नींचा स्वीकार केलेला असतो. खरें ना? परमेश्वराच्या शब्दांनं त्या तुमच्या कायदेशीर भार्या झालेल्या असतात, ही गोष्ट विसरू नका.
१३८ ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१५४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
