या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
श्लोक.
बोले राय गजेंद्र, “सत्य वदतां, संकल्प केला असे,
बाळा वाढविली स्वतंत्र, पण हो तो मान्य मुग्धे नसे;
कन्या मागतसां, रितीं गमत या, सन्मान राखीतसां;
सांगा काय करूं परी, कवण त्या योजूं उपाया, कसा ? ४२
जन्मा आलें कुळिं अमुचिया रत्न हैं दिव्य थोर,
त्यापासोनी गृहिं अवदसा पातली से अघोर;
दुर्दैवानें सुखद जननी माउली, माझि पत्नी
गेली बाळे त्यजुनि; दुहिता वाढवीली स्वयत्नीं. ४३
साकी.
बाल्यापासुनि या तनयेनें सुख नाहीं मज दिधलें,
भलभलते मनिं विचार आणुनि विरसचि जीवन केलें;
ऐसा कर्माचा । घडला खेळ गृहीं साचा. ४४
वाढत होती जननीविरहित तनया जैं, तिजलागीं
ममताविरहित शिक्षण मिळलें, तैं ती झालि विरागी,
आतां मज न कळे । उघडूं केविं तिचे डोळे. ४५
अंजनीगीत.राग माढ - ताल एका.
लग्नाचा म्यां करार केला,
तो तिजलागीं अमान्य झाला;
काय करावें या तनयेला,
न कळे मज आतां. ४६
बालपणीं आवडती बालें,
तोषविती मृदु प्रेमळ बोलें;