देतात. महिलांमधे त्या दोघींच्या शब्दाला किंमतही आहे, आणि सगळ्यांचा
विश्वासही आहे. त्यामुळे गटातल्या महिलांच्या अडचणी त्या सोडवतात.
गटात नुसते पैशाच्या देवाण - घेवाणीचे व्यवहार झाले, तर गटाची
ताकद पुरेशी वापरली जाणार नाही, हे उजाताईंनी बरोबर ओळखल.
बचतगट म्हणजे पैशाची देवाण-घेवाण , एकमेकींना आधार हे आणि
त्याहीपलीकडे - गावाच्या विकासात महत्त्वाचा वाटा उचलणारी ताकद,
दबाव-गट, हे उजाताईंनी ओळखलं ,आणि त्याचा सगळ्यांच्याच
भल्यासाठी उपयोग केला, म्हणून वरव्यातल्या गटांची इतकी प्रगती झाली.
.गावालाही महिलांची ताकद पहिल्यांदाच कळली.
गटात नुसते पैशाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार झाले, तर गटाची
ताकद पुरेशी वापरली जाणार नाही, हे उज्ज्वलाताईंनी ओळखलं आणि
नियम केला की गटातल्या प्रत्येक बाईला कमीत-कमी आपली सही करता
आली पाहिजे,आणि हळूहळू स्वतःचं पुस्तक वाचता आलं पाहिजे.त्यामुळे
बैठकीच्या रात्री गटागटामधून महिला लिहा-वाचायला शिकतायत आणि
शिकंवतायत असं छान दृश्य बघायला मिळतं."
५८ आम्ही बी घडलो।
पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/६४
हे पान प्रमाणित केलेले आहे.