पान:आपले आभाळ पेलताना.pdf/४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सांगितली ती अशी.

 "भाभी मनाला लई आशा होती. भीती वाटत होती. शिनीमातला परसंग डोळ्यासमोर येई नि लाज वाटे. रातच्याला मी गोडा भात रांधला. वेणी फणी केली, डोळ्यात काजळ घातलं. कुंकवाचं बोट व्हटाला चोपडलं. पन काय सांगू ? रात्री लई उशिरा त्या दादाप्पा ढूस पिउन आला अन् मला सोन्याची मुदी काढ म्हनू लागला. मी रडाया लागले तर पलंगाच्या लोखंडी दांडीनं मरुस्तो मारलं मला. नि ढाराढूर झोपून गेला.".

 दुसऱ्या दिवशी शांतू उठली ती थेट सासूच्या दारात उभी राहिली. नंतर दोन वर्ष सासू सुना एकत्र राहात, कमवत, खात. सासूही थकली होती. शेवटी एक दिवस सासून शांतूला अंबाजोगाईला मोठ्या बहिणीच्या दारात आणून टाकले. राहीबाईला सांगितले की सांभाळ तुज्या बहिणीला. सासू दोन दिवस राहून पुण्याच्या लेकाकडे निघून गेली. शांतूच्या आयुष्याला नवे वळण लागले. नवऱ्याने मारले तरी मनात त्याच्याविषयी ओढ होती. दोघी बहिणींनी ठरविले की, शांतूने भरपूर काम करून पैसे साठवायचे. सहा माशाची मुदी नि शर्टचा पीस घेऊन नांदायला जायचे. त्यातच पाठक बाईंचे ... शाळेतील शिक्षिके काम मिळाले. शांतु विश्वासाने बाईकडे पैसे जमा करी. बहिणीचा बारदाना मोठा होता. मेहुणा शाळेत चपराशी, पण चोवीस तास दारुत बुडालेला. त्यात पेन्शनला आलेला. दोन मुकी मुलं नि चार बोलकी मुलं. असा आठजणांचा संसार. कितीही कष्ट केले तरी मिळकत पुरत नसे. तरीही दोन वर्षात हजार रुपये साठले. त्यात थोडी पाठकबाईंनी भर घातली. बहीण, मेहुणा शांतूला घेऊन लातूरला गेले. बरोबर सोन्याची मुदी होती. शर्टपीस होता. पण तिथे वेगळाच डाव मांडलेला होता. शांतूच्या नवऱ्याच्या घरात दुसरीचं बाई त्याची बायको म्हणून उभी होती. ती आई होण्याच्या रस्त्यावर होती. मुदी नवऱ्याच्या अंगावर फेकून शांतू संतापाने जळत परत माघारी आली. पाठक बाईंनी तिला मानवलोकच्या मनस्विनी महिला प्रकल्पाचा पत्ता दिला नि शांतू दिलासा घरातली पहिली मानकरीण झाली.

 शांतूने लिहायवाचायला शिकावे असा वैदेहीचा ... मनस्विनीतील संवादिनीचा नेहमी आग्रह असे. पण या बाईसाहेबाचं मन त्यात कधी रमलंच

आपले आभाळ पेलताना/४१