पान:आपले आभाळ पेलताना.pdf/१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भाऊंबरोबर खेड्यात जायचा योग आला. सभेला एकही बाई नाही. भाऊ म्हाणाले, "महिला नसलेल्या सभेत मी बोलाणार नाही." मग झाली सुरु चुळबूळ. एखादा तरुण असं काही बोलला असता तर खैर नव्हती. बोलणारा, म्हातारा पांढरे केस नि टक्कलवाला. डोळ्यातून नितांत माया वाहणारी. मग कुणीतरी एका वयस्क बाईला, एका आईला आणून बसवले नि सभा सुरू झाली. तर अशा या वातावरणात वाढताना समाजाकडे कुतुहलाने पाहण्याची नजर आपोआप आली. डॉ. व्दारकादास लोहिया १२ व्या वर्षांपासून सेवा दल संस्कारांनी भारलेले, घडलेले. पाठीवर मायेचा हात दादांचा ऊर्फ नारायणराव काळदातेंचा आणि श्री. किंबहुने गुरुजी, ग.धो.देशपांडे या विचारांशी बांधिलकी असणाऱ्या शिक्षकांचा. साथीला जुना सेवा दलाचा संच. नव्या दमाच्या परिवर्तनवादी तरुणांची नवी जोड मिळाली. आणि अशा पारिवारिक वातावराणातूनच 'मानवलोक' आकाराला आले.

 संस्था सुरू करतानाच मनाशी खूणगाठ बांधली होती की, एकाने संस्थेसाठी पूर्णवेळ द्यायचा. दुसऱ्याने भाकरीची सोय पाहायची. १९७४ ते ८० पर्यंत हडपसरच्या महाराष्ट्र आरोग्य मंडळाची एक शाखा म्हणून काम केले. या फांदीला नवी पालवी फुटू लागली. आणि १९८२ ला या फांदीतूनच 'मानवलोक' ऊर्फ मराठवाडा नवनिर्माण लोकायत निर्माण झाले. १९७४ ते ८२ या आठ वर्षात माझे घर मला बांधून ठेवण्याइतके चिमणे राहिले नव्हते. 'मानवलोक' च्या कामात मलाही आस्था होती. हे काम करताना असे लक्षात आले की, भाऊ रानडेंच्या काळातले खेडे अजूनही आहे तसेच होते. स्त्रियांचे जीवन जणू अडथळ्यांची शर्यत. आणि ती त्यांना अगदी नैसर्गिक वाटते. डोंगरभागात काम सुरू केले. तिथे मुलांचे रातांधळेपणाचे प्रमाण ६ टक्के होते. नारू होता, घाण, माशा, डास यांचे थैमान. दरसाली पाच-सहा बायका बाळंतपणात मरत. बाई अडली तर दवाखाना चार कोस दूर. रस्ता नाही. अल्पभूधारकांची संख्या जास्त. दोन-पाच एकर जमीन. तीही कोरडवाहू. पाऊसबाबा धडपाणी आला; तर पहिले पीक घेऊन गावातील साठ टक्के माणूस पुण्या-मुंबईकडे वा साखर कारखान्याकडे धाव घेई. मग त्यातून होणारे बायका-मुलांचे हाल. हे सारे जवळून पाहिले नि मानवलोकने ठरवले की, स्त्रियांच्यासाठी काम सुरू करायचे. ग्रामीण भागातील स्त्रियांचे प्रश्न समजावून घेतल्याशिवाय कामाची आखणी कशी करणार? मग त्याला सुरुवात झाली. प्रत्येक गावात एखादा आड वा डोह असे. ज्यातील आसस

आपले आभाळ येताना/८