पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुन्हेगारांच्या बरोबर कोणत्या ना कोणत्या रूपाने त्यांच्या संपर्कात आहे. निवासी, हितचिंतक त्यासारख्या माझ्या अनेक भूमिका आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की एका अर्थाने बाल गुन्हेगारांची कोणतीच समस्या असत नाही. ख-या अर्थाने ही समस्या समाजाची आहे. आई-वडील, मित्र, हितचिंतक, परिवार आणि परिस्थिती त्यांना बाल गुन्हेगार होण्याला विवश करतात. त्यांना गुन्हेगारीच्या कलंक आणि किल्मिषापासून वाचविण्यासाठी तसेच त्यांना सर्वसामान्य मूल बनविण्याचे सर्व प्रयत्न त्याच लोकांनी केले पाहिजेत जी त्यांना गुन्हेगार आणि उपेक्षित बनवितात.

 “मुले ही राष्ट्राची संपत्ती आहेत," असे मानणाच्या बालकप्रेमी जनतेलाही हे विसरता येणार नाही की दक्षिण आशिया क्षेत्रीय संघटन अर्थात, (सार्क) च्या देशांनी; ज्याच्यात आपला भारताचा देखील समावेश आहे, त्यांनी ‘बालिका वर्ष' (१९९०) च्या रूपात साजरे केले आहे. गुन्हेगार फक्त मुलेच असतात असे नाही तर मुलीसुद्धा असतात. अल्पवयात वेश्या व्यवसाय करणे, सिनेमा तिकिटांचा काळा बाजार, अंमली पदार्थांचा व्यापार करणे इत्यादी सारख्या अनेक प्रकारांनी मुली गुन्हेगारी जगाच्या शिकार होतात. आपल्या इथे अशा मुलींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन खूप अनुदार आहे. सीता निष्कलंक असेल, पण तिने अग्निपरीक्षा ही दिलीच पाहिजे. समाजाची ही पारंपरिक धारणा या निष्पाप मुलींशी नेहमी अन्यायाने वागत आली आहे. ही धारणासुद्धा बदलण्याची आवश्यकता आहे. मुलगा नादान निघाला तरीसुद्धा त्याला पुरुष मानले जाते, पण मुलीच्या नादानीला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. या व्यवस्थेला कोण बदलेल? कोणी देवदूत येऊन हे काम करणार नाही. हे काम आमचं आहे. आपल्यालाच हे पार पाडलं पाहिजे.

आकाश संवाद/६६