पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुण ठरू लागतात. भारतात औषधी आणि सुगंधी वनस्पती विपुल आहेत. त्यांच्यातील औषधी आणि सुगंधी गुण डोंगराळ जंगली भागात जितके दिसून येतात तितके त्याच वनस्पतीच्या शास्त्रशुद्ध शेतीत आढळत नाहीत. दुर्गम प्रदेशात जाऊन वेचलेल्या असल्या वनस्पतींना मोठी मागणी येत आहे.
 सगळ्यात गंमत म्हणजे, वर्षानुवर्षे मोठे कष्ट करून शेतकरी ज्या तणांना नष्ट करण्याच्या खाटाटोपास लागलेला आहे ती हरळी, कुंदा, बावंच्या यांच्यासारखी तणे एकदम मूल्यवान द्रव्ये ठरत आहेत. 'आधुनिक शेतीशास्त्रात आपण मागे राहिलो, आता शास्त्रनिपुण विलायती शेतकऱ्यांसमोर आपण कसे काय टिकू शकणार?' असा भयगंड बाळगणाऱ्या या 'नाथांच्या उलट्या खुणां'त एक संदेश आहे. 'महापुरे झाडें जाती, तेथे लव्हाळी वाचती.' व्यवस्थेत खुलेपण असले, की कमजोरीचे मुद्देच बलाढ्य ताकद ठरू शकतात.

दि. २०/१२/२०००
■ ■

अन्वयार्थ – दोन / १३७