पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 झालेली असते. अफगाणिस्तानच १९७८ चे सत्तांतर म्हणजे अशीच क्रांती होती. (डाव्या विचारांचे लोक वगळता इतरांना ते केवळ लष्करी बंड वाटतं. पण एक लेखक व अभ्यासक म्हणून मला ती क्रांती वाटते) डाव्या विचारांची समतेसाठी झालेली क्रांती होती." हा त्यांच्या खुलासा पुरेसा स्पष्ट आहे.
 याच क्रांतीच्या बाबतीत देशमुख पुढे सांगतात की, "ही क्रांती इस्लामी धर्मश्रद्धांवर घाव घालणारी असल्यामुळे तिच्या प्रतिकारासाठी व तिला संपविण्यासाठी कट्टर मूलतत्त्ववादी नेत्यांनी धार्मिक शस्त्र निवडलं. त्याचं नाव होतं. 'जिहाद' (धर्मयुद्ध). यातूनच प्रथम मुजाहिदिन (धार्मिक नेते) व नंतर तालिबान (धार्मिक विद्यार्थी) निर्माण झाले. म्हणून या संघर्षाचं स्वरूप इन्किलाब (क्रांती) विरुद्ध जिहाद (धर्मयुद्ध) असं आहे. त्याला अनेक पैलू व संदर्भ आहेत. त्यामध्ये लोकशाहीवादी मूल्यं विरुद्ध कट्टर धार्मिक मूल्यं यांचा रोमहर्षक सामना आहे. स्त्रीच्या समतेसाठी संघर्ष विरुद्ध बुरख्याच्या कालात अंधारात सर्वला दडपाण्याची धार्मिक व पुरुषी प्रवृत्ती आहे. आधुनिक पाश्चात्त्य उदारमतवादी मूल्यं ही भोगवादी व स्वैर जीवनातील प्रतीकं आहेत व ती गैरइस्लामी असल्यामुळे त्याज्य आहेत असं मानून पाश्चात्त्य जग, विशेषत: अमेरिका, इस्लामसाठी शत्रुवत आहे - ही रुजत जाणारी विचारधारा विरुद्ध जगात जहाल इस्लाम हाच खरा श्रद्धेय इस्लाम आहे असं समजून तो दृढ करण्यासाठी चाललेला प्रयास आहे."
 स्वत: लेखकाला मान्य असलेली मूल्ये कोणतीही असोत. या तीनही संस्कृींचे वर्णन करताना त्याने पक्षपात करून इस्लामी विचारधारा काळ्या रंगाने चितारली नाही. उलट इस्लामची कट्टर भूमिका मांडणाऱ्यांचे म्हणणेही त्याने सहानुभूतीने सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे दिसून येते. लेखकाची वैयक्तिक धारणा एक गोष्ट झाली, आणि ती गृहीत धरूनही कलात्मक तटस्थतेला धक्का न लावणे ही दुसरी - याचे भान लेखकात असल्याचे जाणवते, याचा आवर्जून उल्लेख करायला हवा.

 जगाच्या पाठीवरील विशिष्ट भूराजकीय स्थान आणि स्थानिक लोकांच्या विशिष्ट (स्वतंत्र्यप्रिय, भांडकुदळ वगैरे) स्वभाव, शिवाय अशा स्थानी असलेल्या अशा स्वभावाच्या लोकांनी केलेला एक कट्टरवादी धर्माच्या अंगीकार, यातून अफगाणिस्तानची शोकांतिक उद्भवते. त्याच्या या स्थानामुळे त्याच्यावर आपले नियंत्रण असावे असे इतर स्पर्धिष्णू राष्ट्रांना वाटणे ही एक राजकीय अपरिहार्यताच म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे अशा राष्ट्रांचा कडवा प्रतिकार करणे हा तेथील लोकांच्या स्वाभावाचाच भाग झाला. या प्रतिकाराने विशिष्ट रूप धारण करणे हा तेथील लोकांनी स्वीकारलेल्या धर्माच्या परिणाम होय. भूमी, लोकस्वभाव आणि

अन्वयार्थ □ १९७