पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खेळाडूंमधील 'माणूसपणाची' शोधयात्रा


प्रा. मिलिंद जोशी


 लक्ष्मीकांत देशमुख हे हरहुन्नरी लेखक आहेत. साहित्याच्या विविध प्रांतात ते लीलया संचार करतात. खरं तर प्रशासन, न्याय व्यवस्था आणि राजकारण ही तीन क्षेत्रे अशी आहेत की या क्षेत्रात कार्यरत राहताना माणसांची संवेदनशीलता बोथट होण्याचा फार मोठा संभव असतो; कारण मानण्याचे नानाविध आकार आणि प्रकार तसेच माणसांचे अंतरंग या क्षेत्रात खूप जवळून अनुभवायला मिळतात. प्रशासनातले आपले कर्तव्य निष्ठेने बजावत असताना त्यांनी तेवढ्याच मनस्वीपणे साहित्यसेवा केली. पुलंनी म्हटल्याप्रमाणे काही वेळा माणसं अपयशापेक्षा यशानेच अधिक मुर्दाड बनतात. स्वत:च्या कर्तृत्वावर यशाची शिखरे सर्व करताना लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्वत:चे संवेदनशील मन कधीही हरवू दिले नाही. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, अतिशय तरल संवेदना, अनुभवातून जीवनाचा अन्वयार्थ लावण्याची त्रयस्थ वृत्ती आणि त्या अनुभवाला साहित्यरूप देण्यासाठीची खास लेखनशैली यामुळे त्यांच्या लेखनाला मोठा प्रमाणावर वाचक वर्ग लाभला. आपल्या लेखनातन विषयांचे वैविध्य जपत त्यांनी तो टिकवलाही. लेखनातले सातत्य आणि ते राखताना त्यांनी 'कसदारपणाशी कधीही तडजोड केली नाही. म्हणूनच आजच्या बिनीच्या साहित्यकारांमध्ये त्यांची गणना होते.
 नंबर वन' हा त्यांचा साकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेला कथासंग्रह म्हणजे खेळाडूंमधील माणसूपणाची शोधायात्राच आहे. खेळाडू आणि कलावंत हे नेहमीच समाजाच्या आदराचा, कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय असतात. समाजातल्या इतर घटकांना आपापल्या वकुबाप्रमाणे मानमरातब, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी लाभते. पण कलावंत आणि खेळाडूंच्या वाट्याला या सर्वांच्या बरोबरीने येते ते लोकप्रेम. या लोकप्रेमावर लोकक्षोभाची गडद किनारही असते. खेळाडूंनी केलेल्या गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळे ते लोकप्रेमाचे धनी होतात. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या अपेक्षा वाढत






अन्वयार्थ १२३