पान:अंगारमळा (Angarmala).pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुशीतील आचेने सिद्ध झालेले कार्यकर्ते


 २० एप्रिलला मी दिल्लीत होतो. माझ्यापर्यंत निरोप यायला उशीर झाला. आंबेठाणहून मला फोन आला, 'गुरुजी गेले'. पन्नास वर्षांपूर्वी हेच दोन शब्द मी ऐकले होते. सानेगुरुजींनी जळगावमध्ये विष खाऊन आत्महत्या केली. त्या वेळीही सेवादलाच्या सैनिकांपुढे हे दोनच शब्द आले होते - 'गुरुजी गेले.'

 श्रद्धांजली, श्रद्धांजली म्हणून माणसाकडून जी काही वाहिली जाते ती बातमी कळल्यानंतर पहिल्या दहा सेकंदांत वाहिली जाते. हे माणूस आता पुन्हा आपल्याला दिसणार नाही; त्याचं चालणं कसं, त्याचं बोलणं कसं, त्याचं सलगी देणं कसं हे पुन्हा आपल्याला अनुभवायला मिळणार नाही असं लक्षात आल्यानंतर त्याच्या आणि आपल्या ओळखीचा, सहवासाचा सगळा चित्रपट त्या पहिल्या दहा सेकंदांत आपल्या डोळ्यासमोर उघडून जातो. ओळख कोठे झाली, त्याची काय काय वैशिष्ट्ये दिसली, आपल्यावर त्याचा काय प्रभाव पडला त्याचे सिंहावलोकन ही खरी मनोमनची श्रद्धांजली त्या पाचदहा सेकंदांत वाहिली जाते आणि मग, औपचारिकरीत्या आपण सगळे एकत्र जमतो, आपल्या आठवणी दुसऱ्यांना सांगतो, दुसऱ्यांच्या आठवणी ऐकून घेतो. तो एक औपचारिक बुडबुडे काढण्याचा भाग असतो, त्याच्यात आपल्या दु:खावर थोडं मलम लागतं आहे का याचा थोडा तपास असतो.

 मी सकाळी शेवाळेगुरुजींच्या घरी गेलो. त्यांच्या वृद्ध आई काठी टेकीत टेकीत आल्या आणि मी त्यांना सहज म्हटलं, "या वयामध्ये एवढा मोठा कर्तासवरता मुलगा जाणं याच्याएवढं मोठं दु:ख कोणतं नाही." पण मग पटकन माझ्या लक्षात आलं, की आपण शेवाळेगुरुजींच्या आईवर फार कठीण वेळ आहे, असं म्हटलं तर त्याहीपेक्षा कठीण वेळ माझ्यावर आली आहे. आता गुरुजींना श्रद्धांजली वाहताना अनेकांनी म्हटलं, की शेवाळेगुरुजी हे शेतकरी आंदोलनातील एक गुरू होते. म्हणजे एका तऱ्हेने पात्रता नसताना, गोविंदाची भूमिका माझ्याकडे येते. त्या गोविंदाची अवस्था, प्रत्यक्षात आपला शब्द जगभर पसरवणारा गुरू जगातून नाहीसा झाला तेव्हा किती कठीण झाली असेल?

 माझी अशी अवस्था होऊ नये अशी माझी फार इच्छा असते. दोन वर्षांपूर्वी मी स्वत: आजारी होतो. आपल्यापैकी अनेकांनी मला त्यावेळी त्या अवस्थेत पाहिले आहे, सेवा केली, मदत केली. त्या वेळी मला असं वाटत होतं, की या आजारातून मी काही

अंगारमळा । ८३