पान:अंगारमळा (Angarmala).pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ड्रायव्हरचा अंदाज. 'असे कसे होईल ! बघा बघू.' एका पोलिसाने पेट्रोल टाकीचे झाकण उघडून अंधरात आत बघायचा प्रयत्न केला, भोवती आमचे कोंडाळे, "अहो, हवालदारसाहेब, असं कसं दिसेल? टॉर्च नाही का? मग ही काडीपेटी घ्या, काडी शिलगवा आणि टाकीच्या तोंडाशी धरून बघा." आम्ही हसून हसून बेजार. नगरहून गाडी पुढे औरंगाबादकडे गेली. हर्सूल तुरुंगाच्या प्रांगणात जाऊन थांबली. तोपर्यंत सकाळ झाली होती. तुरुंग अधिकारी आम्हाला घ्यायला तयार नाही. वरून सूचना नाही म्हणे. मग आम्ही तेथील पारावर मुक्काम ठोकला. कैद्यांना भेटायला आलेली त्यांची नातलग मंडळी भोवताली होती. आम्ही पँट मनिलावाले दिसलो. त्यांना वाटे आमचा काही उपयोग होईल. नातलग कैद्याला कसे सोडवावे याची विचारणा ते करत. बाबूलाल आणि शंकरराव अगदी गंभीर चेहऱ्याने त्यांना सांगू लागले, ते नाही जमत बाबा, ते लई खर्चाचे काम. दोनपाच हजार रुपये तर वरच्या अधिकाऱ्यांनाच द्यावे लागतील. आमच्या सारख्या मधल्याचे आणखी दोनपाच हजार.'एका पाहुण्याने खरंच हजारभर रुपये बाबूलालच्या हातावर ठेवले आणि म्हणाला, 'गरिबाचे काम एवढ्यात भागवा.' आमची हसून हसून मुरकुंडी. तेथून जी हसायला सुरवात झाली ते कोठडीचे दहा दिवस आम्ही हसतच होतो.

 हर्सूल येथील तुरुंगाचे खाणे अगदीच भिकार. आम्ही कांदा मागवून घेतला. अधिकाऱ्याने सांगितले कांदा विकत घ्यावा लागेल. "काय भाव?" "एक रुपया किलो." यावर बाबूलालची तंबी, “काय साहेब, ६० पैसे भाव मिळावा म्हणून आम्ही तुरुंगात आलो आणि तुम्ही आमच्याकडून रुपया भाव घेता? हे फार गंभीर प्रकरण आहे. आम्हाला तक्रार करावी लागेल.' बिचारा तुरुंग अधिकारी! त्याने मान्य केले, "तुम्ही असेपर्यंत तुम्हाला कांदा फुकट."

 बाबूलाल आपल्या घरच्या कहाण्या सांगायचा. आईची नक्कल करायचा. आई म्हणते, "एवढा नऊ महिने मी तुला पोटात वाढविला आणि लग्नानंतर ८ दिवसांत तू बायकोच्या तालावर नाचू लागलास?"आता आईला सोडून नवे नवरे बायकोचे का ऐकू लागतात काय सांगावे? बाबूलाल कथा सांगत होता, "मी उत्तर दिले, तू मला पोटात वाढवलेस खरे, पण त्यावेळी माझे वजन ते काय? अगदी शेवटीसुद्धा सातआठ पौंड. उलट, सुषमाचे बघ." या अफाट विनोदावर आम्ही सर्व सत्याग्रही कैदी अक्षरश: गडबडा लोळू लागलो.

 असा हा बाबूलाल २३ मे २००४ रोजी आम्हांला सोडून गेला.

 शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात संघटनेचे नाव माहीत नाही, कोणी नेता नाही, साधने नाहीत अशा परिस्थितीत शिवाजीच्या या मावळखोऱ्याच्या परिसरात ही

अंगारमळा । ८१