पान:अंगारमळा (Angarmala).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हाक मरली आणि आपण हजर नव्हतो असे होता कामा नये ही त्यांची तहान.

 माझ्या आजारपणात इस्पितळात असताना शंकररावांना असाध्य कॅन्सर झाल्याची बातमी कळली. काही दिवसांचाच प्रश्न आहे हेही स्पष्ट झाले. इस्पितळातून बाहेर पडल्यावर मी त्यांना भेटायला गेलो आणि ऐंशी सालच्या गप्पाटप्पांच्या थाटांत म्हणालो, 'शंकरराव मला सोडून पुढे चालले काय?' जणू काही झालेलेच नाही अशा अविर्भावात शंकरराव म्हणाले, "छ्यॅ, छ्यॅ, आपण कुठे जात नाही.' पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी असे बोलल्यानंतर विडी काढून शिलगावली असती, आता ते शक्य नव्हते. विडीही ओढायची नाही आणि सध्या संघटनेचे काही निकडीचे काम लवकर निघायची शक्यता नाही हे हेरून शंकराव गेलेले दिसतात. त्यांची ओळख झाली ते पूर्वजन्मीचा ऋणानुबंध असल्यासारखी. पुढच्या कोणत्या तयारीसाठी शंकरराव निघून गेले, कळायला आज काहीच साधन नाही.

 

(शेतकरी संघटक, २१ ऑगस्ट १९९५)

■ ■ 

अंगारमळा । ६९