अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/नोकरीबाबत स्थितप्रज्ञ राहा

विकिस्रोत कडून

नोकरीबाबत स्थितप्रज्ञ राहा

 लग्न हे एकदाच करायचं आणि आयुष्यभर टिकवायचं असतं' असा संस्कार असतो. बहुतेक भारतीय व्यवथापकांचा नोकरीबाबतही हाच असतो. एकदा त्याला ती मिळाली की ती बदलण्याचा विचार तो क्वचितच करतो.

 काही दशकांपूर्वी हा विचार सुसंगत होता. त्यावेळी नवं आणि पहिल्यापेक्षा चांगलं काम मिळण्याची शक्यता कमी असायची. सारखी नोकरी बदलणाऱ्या उमेदवाराकडे कंपन्यांही संशयानं बघायच्या. नोकरी सोडणं म्हणजे कंपनीशी बेईमानी असं समजलं जायचं.

 आता परिस्थिती काहीशी बदलली आहे. विद्यमान नोकरी चांगली असली तरी अनेक कारणांमुळं ती सोडणारे काही व्यवस्थापक अलीकडे दिसू लागलेत. तथापि बहुसंख्य भारतीय व्यवस्थापक नोकरी गृहीत धरतात आणि तिच्याकडे त्रयस्थपणे पाहण्याची त्यांची वृत्ती नसते. सध्याच्या काळात एकाच नोकरीमध्ये भावनात्मक रीतीनं गुंतून न राहता, हा त्रयस्थ दृष्टिकोन स्वीकारणं आवश्यक झालं आहे.

 आपली पत्नी किंवा पती मनाजोगता मिळाला नाही, म्हणून त्यात बदल करायचा हे आपल्याला पटत नाही. अगदीच गंभीर कारण घडल्याशिवाय घटस्फोटाचा विचारही केला जात नाही. कारण किरकोळ कारणांवरून लग्नं मोडल्यास संसार अस्थिर होतील आणि पर्यायाने समाज अस्थिर होईल ही भावना त्यामागं असते. लग्नाच्या बाबतीत हे ठीक आहे, पण नोकरीसंबंधी असा विचार केल्याने काही वेळा व्यवस्थापकाचं नुकसान होऊ शकते.

 कंपनीने कर्मचारी संख्या कमी करण्याचा निर्णय घेणं हे नोकरी सोडावी लागण्यामागचं कारण असतं. मात्र कामाबाबत समाधान न वाटणं. तसंच कामातून समाधान न मिळणं ही देखील नोकरी सोडण्याची कारणं होऊ शकतात. सध्याचा काळ विचित्र आहे. एकीकडं तंत्रज्ञानाच्या प्रगतीनं नवे नवे उद्योग निर्माण होत आहेत. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. तर दुसरीकडं प्रस्थापित उद्योगांची कक्षा मंदीमुळे आकसत

कदा मी रेल्वेने दूरच्या प्रवासाला निघालो होतो. प्रत्येक जंक्शनवर एक झाडूवाला येऊन आमचा फस्टक्लासचा डबा स्वच्छकरीत असे.डब्यातले प्रवासी त्यांच्याशी अत्यंत उर्मटपणे वागत. झाडूवाला झाला म्हणून काय झालंं त्याच्याशी आपण चांगलंच वागलं पाहिजे असं मला वाटू लागलं. पुढच्या जंक्शनवर मी डब्यातून उतरलो. जवळून जाणाच्या झाडूवाल्याला म्हणालो आमचा डबा स्वच्छ करून देशील का?’त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि एकदम प्रश्न केला,‘आपल्याजवळ तिकीट आहे का?’

 ‘असं का विचारता?’.मी त्याला म्हटलं.
 ‘आम्ही कामगार माणसं. फस्टक्लासमधील श्रीमंत माणसं आम्हाला घालून पाडून बोलतात. आपण मला विनंती केलीत. मला वाटल आपण माझी चेष्टा करताय, मी आपल्याला तिकीट विचारलं.’ तो उत्तरला.
 आपल्याकडे कामांची ‘हलकी कामं’ आणि ‘प्रतिष्ठेची कामं' अशी विभागणी आहे. तथाकथित हलकी कामे करणाच्यांचा अपमान करायचा, त्यांना त्यांच्या पायरी ची सतत जाणीव करून द्यायची, हा स्वतःचा अधिकार आहे असं उच्चभ्रू माणसंं समजतात. आणि अशी कामं करणार्यांच्याही ते इतकं अंगवळणी पडलेलं असतं की एखाद्यानं त्यांची मृदू भाषेत विचारपूस केली तरी त्यातून ते दुसरा अर्थ काढण्याची शक्यता असते.
 दुसरा एक प्रसंग सांगतो मी एका पंचतारांकित हॉटेलच्या स्वागतकक्षात उभा होतो. आजूबाजूला अनेक भारतीय आणि परदेशी अतिथी होते. माझ्या लक्षात आलं की तिथल्या रिसेप्शनिस्ट विदेशी अतिथींचं आगतस्वागत जास्त चांगल्या प्रकारे करीत आहेत. भारतीय पाहुण्यांकडे मात्र त्यांचंं दुर्लक्ष होताना दिसलं. एका रिसेप्शनिस्टला मी विचारलं, ‘भारतीय आणि परदेशी पाहुण्यांमध्ये तुम्ही असा पक्षपात का करता?
 ‘आमच्या व्यवस्थापकाला सांगणार नसाल तर सांगते. भारतीय पाहुण्यांना चांगल्या आतिथ्याची किंमत नसते. याउलट परदेशी पाहुणे आमचे स्वागत तितक्याच सभ्यतेनंं आणि मृदूपणानं स्वीकारतात. साहजिकच आमचे लक्ष विदेश अतिथींकडंं अधिक अशा एका व्यवस्थापकाची व्यथा त्याच्याच शब्दांत पाहा.
 मी कंपनीत कार्यव्यवस्थापक होतो. तेथे कर्मचाऱ्यासंबंधी काही समस्या निर्माण झाल्या. गैरवर्तन करणाच्या कर्मचाऱ्यांंविरूद्ध कठोर कारवाई करावी अशी सूचना मी केली. मात्र यामुळंं कर्मचारी संपावर जाऊन उत्पादनावर परिणाम होईल आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धा कंपन्या उठवतील असं वाटल्याने व्यवस्थापनाने माझी सुचना नाकारली. त्यामुळे माझ्यावर अवलंबून असणाच्या सहकार्यांमध्ये माझी नाचक्की झाली. त्यांच्या दबावामुळे मला व्यवस्थापनाशी या विषयावर वाद घालावा लागला त्यांनी मला नोकरी सोडण्याची सूचना केली. पण घरच्या समस्यांमुळे तस करणंं अशक्य होतं. अपमान सहन करून नोकरी टिकवणंं भाग होतं’
कामातून समाधान न मिळणं :
 "कित्येकदा कामातून पैसा मिळाला तरी मानसिक समाधान मिळेलच असं सांगता येत नाही. 'जॉब सॅटिसफॅक्शन' मिळाल्याखेरीज काम केल्यासारखंं वाटत नाही. व्यवस्थापकानं मला सांगितलं, ‘मी कामाला सुरुवात केली तेव्हा पगार व स्टेटस याबाबत मी समाधानी होतो. काही वर्षांनंतर मला सारखं या कामावरून त्या कामावर हलविण्यात येऊ लागलं. कोणत्याही प्रकल्पावर एक वर्षांच्यावर मला टिकवण्यात येत नसे. मी सादर केलेल्या अहवालचंं कौतुक होत असे पण त्यांची अंमलबजावणी झालेली दिसत नसे.त्यामुळंं आपण वेळ आणि बुद्धिमत्ता वाया घालवत आहोत असं वाटून मी अस्वस्थ होई अपेक्षेइतका पगार असूनही कामातून समाधान मिळत नसे.'
 वरील उदाहरणांचं तात्पर्य असं की, कर्मचाच्यांची संख्या कमी करण्याचंं धोरण, व्यवस्थापकाची प्रतिष्ठा, कामाचे स्वरूप, वातावरण, समाधान अशा अनेक बाबी नोकरी सोडावी लागण्यास ठरतात. अशा स्थितीत व्यवस्थापकानंं काय करावं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या नोकरीकडं स्थितप्रज्ञ दृष्टीने आणि त्रयस्थ भावनेने पाहिल्यास यातील बऱ्याच समस्या सुटू शकतात. ही दृष्टी कशी विकसित करावी याबद्दल पुढील लेखात पाहू.