________________
करा. सुख दिसायला लागेल, आनंद चमकायला लागेल. त्या ज्ञानी माणसाचे म्हणणे आहे 'बाहेर जाऊन सुख आणि आनंद शोधायची गरज नाही, ते तुमच्या आत आहे, फक्त मनातला कचरा काढून टाका.' आमच्या लहानपणी गल्लीत चौकीदार फिरायचा आणि रस्त्यावर दांडकं आपटत रात्रभर म्हणायचा 'जागते रहो', बस आपणही म्हटलं पाहिजे 'जागते रहो'. दिवसरात्र सजग रहा.स्वतःचे साक्षीदार बना स्वतःकडे बघा. तु खुदको बदल, तबही तो जमाना बदलेगा। ४
44 -- - - -- --- - - तु खुद को बदल २कूद को बदल २ । तब ही तो जमाना बदलेगा । काही मनोवैज्ञानिक म्हणतात की घृणा व राग स्वाभाविक नाही, प्रेम हे। स्वाभाविक आहे. घृणा आणि राग निर्माण केली जातात, शिकविले जातात. त्यांच्याशी बोलू नका. त्यांना कमी लेखा, ते दुस-या धर्माचे आहेत.तो शेजारचा देश आपला दुश्मन आहे. टीव्ही, वर्तमानपत्र, कुटुंब, शाळा, नेता, धर्मगुरु असले संदेश देत असतात. छोटया आणि मोठयांमध्ये शत्रुता , घृणा आणि दरी निर्माण करीत असतात.