पान:गांव-गाडा.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६      गांव-गाडा


जागल्यांना रोकड किंवा धान्य खावटी देते त्याला डोल म्हणतात.) घालावे याचा सरकारने खाली लिहिल्याप्रमाणे निर्बंध केला आहे.

लोकसंख्या   महार   जागल्या
१ ते ५००      
५०१ ते १०००      

आणि पुढे दर १००० लोकसंख्येला १ महार व १ जागल्या. यावरून एवढें खास की, हे प्रमाण एरवींच्या दिवसांत फारच सढळ होईल. तेव्हां महार-जागल्यांसंबंधाने अगदी निकडीची सुधारणा ह्मटली ह्मणजे कामाच्या मानाने गावाप्रत त्यांची संख्या ठरविणे, नेमणुकीच्या महार-जागल्यांखेरीज इतरांना काळी-पांढरीत हक्क उकळण्याची सक्त मनाई करणे, आणि त्यांचे वतन रजिष्टर करणे ही होय. सरकारच्या सर्व खात्यांत वेळोवेळी छाटाछाट होत असतांना महार-जागल्यांच्या संख्येला धरबंध असू नये आणि या पेंढाराने सरकारच्या नांवावर बेसुमार चरावें ही नैतिक व सांपत्तिक पिछेहाट होय !

 शेतांतील वहिवाट,वांटण्या, विहीर, पाट यांचे पाणी घेण्याच्या पाळ्या इत्यादि कामी महार-जागल्यांच्या तोंडी पुराव्याचा रयतेला उपयोग होत नाही. पिकाचें, फळांचे व गुरांचे रक्षण कुणब्यांना जातीने किंवा राखणदार ठेवून करावे लागते. भडोच जिल्ह्यांतील झाडेश्वर गांवीं असे समजले की, सुमारे १०।१२ वर्षांपासून शेती सांभाळण्यासाठी कुणब्यांना अजमासें ६०० सिंधी लोक दरसाल पगार देऊन ठेवावे लागतात. नगर जिल्ह्यांतील शेवगांव तालुक्यांतील मुंगी व लाखेफळ गांवीं कुणब्यांनी अनुक्रमें ५ ते ७ व २ खंडी धान्य दरसाल देण्याच्या कराराने कोल्हाटी लोक पिकें राखोळीसाठी ठेवल्याचे पाहण्यात आले. रानडुकरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी कांहीं ठिकाणी कुणबी शेतांत पिकाभोंवतीं खोल व रुंद खंदक खणतात, आणि कित्येक ठिकाणी कोल्हाटी, वड्डर वगैरे मोलाने ठेवतात. ह्याप्रमाणे ह्या कामांतही कुणब्यांना महार जागल्यांचा उपयोग होत नाही. गावकऱ्याने स्वतःसाठी किंवा पाहूण्यासाठी महार-जागल्यांपैकी वाटाड्या