पान:अशोक.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांव-मुकादमानी. ५९ः रांत त्यांचें पिढीजाद वजन असे. जोंपर्यंत मामलतीवर जमेदारांच्या । नेमणुका होत तोंपर्यत रावापासून तों रंकापर्यत जणों काय एकीशीं एक अशा पाय-या लागून राहिल्या होत्या,आणि रांगेनें किंवा ओघानें कोठंना कोठं तरी सर्वांचा पछा पोहचे, व दुःखपरिहार होई. मुलकीप्रमाणें गांवचे फौजदारी आधिकारही पाटलाला होते, आण । मुलकी कामांत जे त्याचे मदतगार व वरिष्ठतेच फौजदारी कामांत असत. ह्या कामांत त्याला मुख्य मदत जागल्याची असे, आणि त्याचा वरिष्ठ मामलेदार होता. कुळकर्णी दप्तरचें काम करी आणि जागल्या गांवचा । बंदोबस्त ठेवी. बलुतें, शेव वगैरेसाठीं चोहोंकडे पायपीट आणि चटपटलटपट करण्याचा महार जागल्यांना बालाभ्यास असतो; व ते माणसाचें पाणी तेव्हांच जोखतात. जागले वहिमी जातीचे असतात. 'चेोराच्या हवालीं किल्लुद्द्या’ हें तत्त्व त्यांच्या नेमणुकीच्या मुळाशीं असावें. गांवचे सर्व बदमाष जागल्याला माहीत असत. गांवाच्या शिवंत झालेल्या चोरीचा पत्ता लावण्याची 'बाप दाखीव नाहीं तर श्राद्ध कर” असली जबाबदारी त्यावर असे. चेोरीचा माग शिवच्या बाहेर निघाला नाहीं तर जागल्याकडून चोरी भरून घेत; आणि जर ऐवज त्याच्या ऐपतीबाहेर असला तर किंवा दुस-या गांवाच्या शिवारापर्यंत माग नेऊन भिडविला कीं, त्याच्या गळ्याचें पेंडें सुटे आणि तें सदर गांवाच्या जागल्याच्या गळ्यांत पडे. असें होतां होतां ज्या गांवापुढें माग जात नसे त्या गांवाला चेौरी भरून द्यावी लागे. जागले पाटलांची कसूर किंवा सामलात दिसून आल्यास त्यांचे इनाम काढून ते त्यांच्या बिरादरांना देण्यांत येत. गुन्ह्याच्या तपासांत आरोपी कबूल व्हावा, त्यानें मुद्देमाल काढावा, व आपल्या साथीदारांचीं नांवें सांगावींत म्हणून त्याला मारपीट करून त्याचे फार हाल करीत; आणि मारहाणीच्या निशाण्या त्याच्या अंगावर दिसून येऊं । नयेत अशी खबरदारी घेत. स्वतः किंवा पंचामार्फत फिर्यादीचा निकाल लावून अपराध्याला दंड, कैद करण्याचा अधिकार पाटलाला असे.पेंढारी,