पान:अशोक.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांव-गाडी, वळल्यामुळे राजाधिकारी व धर्माधिकारी कालांतरानें वतनदार झाले आज आहे उद्यां नाही, असल्या मिळकतींत जीव काय ? कांहीं केलें तर तें असें करावें कीं, पिढ़न्यानपिढ़या त्याला घोर नाहीं, ह्या विचारानें वतन निर्माण केलें. राजानें राज्य कमावलें तें एकठ्यानें नव्हे, त्याला राज्य संपादन करण्याच्या कामीं ज्यांनीं आपल्या खांद्याशीं खांदा भिडवून संपति, संतति व आपला स्वतःचा प्राण ह्यांची पर्वा केली नाहीं, त्यांचाच ओढा आपणाकडे असणार,आणि कमावलेलें राज्य संभाळण्यांत त्यांचीच योजना करणें अवश्य व हितकर आहे,असें कृतज्ञतापूर्वक ध्यानांत आणून ज्यांची जशी मदत व प्रेम त्याप्रमाणें राजांनीं त्यांना असाम्या दिल्या. स्वतःबरोबरच आपल्या संतानाच्या कल्याणाचा विचारः मनांत न बोलावतां येतो, आणि साहजिंक असें वाटावयाचें कीं, नव्याचा प्रतीति घेण्यापेक्षां देखला पाणोथा खास बरा. जे आपल्या कामा आले अधिक आहे. पूर्वीच्या धामधुमीच्या काळांत जगामाची. किंमत फार असें लोक मानीत. त्यामुळे रोकडीच्या मानानें कमी उत्पन्नाचें स्थावर असलें तरी तें निरंतर टिंकणारें असतें, असा विचार मनांत वागवून कामगार रोकडीपेक्षां स्थावराला जास्त चहात. शिवाय ज्या राजानें स्थावंराची नेमणूक करून दिली त्याचें राज्य टिकलें तर ती नेमणूक वोलेल, ही गोष्ट कोणालाही क नोगी आहे. तेव्हां स्थावर नेमणुका करून दिल्या म्हणजे त्या स्वस्त्या पडतील व नेमणूकदार आपल्या पेटतिडकेसाठी राजनिष्ट राहातील, इतकेंच नव्हे तर राजासाठीं पैशानें, शरीरानें व स्थावरावरील मालकीमुळे रयतेवर प्राप्त होण्या १ १ ‘तुल्यवेतनोऽस्मि, भवद्भिः सह भोग्यमिदं राज्यम् ।।' अशी प्रसिद्ध राजनीति ,