श्री करवीरपुरवासिनीची आरती
<poem> करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता। पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता ॥ कमलाकारें जठरी जन्मविला धाता। सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरुपें तुं स्थुलसुक्ष्मी ॥ धृ. ॥
मातुलिंग गदायुत खेट्क रविकिरणी । झळके हाटकवादी पीयुषरसपाणी ॥ माणिकदशना सुरंगवसना म्रुगनयनी । शशिधरवदना, राजस मदनाची जननी ॥ २ ॥
तारा शक्ती अगम्या शिवभजकां गौरी ॥ सांख्य म्हण्ती प्रकृती निर्गुण निर्धारी ॥ गायत्री निजबीजा निगमागम सारी । प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥ ३ ॥
अमृतभरिते सरितें अघदुरितें वारी ॥ मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं ॥ वारी मायापटल प्रणमत परीवारीं । हे रूप चिद्रुप दावी निर्धारी ॥ ४ ॥
चतुराननें कुश्चितकर्माच्या ओळी । लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी ॥ पुसोनि चरणा तळी पदसुमने क्षाळी । मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ ५ ॥
<poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |