पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६५६ बृहद्योगवासिष्ठसार. होऊन कसा राहीन ! ज्याने सर्व अंगांस संतप्त करून सोड. माहे व ज्याने शरीरातील सर्व धातूंना जाळून टाकलें आहे असा हा भयंकर व दीर्घ संसारज्वर कधी नाहीसा होईल ! वायुरहित प्रदेशांतील दिव्याच्या ज्योतीप्रमाणे व्यथारहित झालेले चित्त शांत केव्हा होईल. इंद्रिये विषयांचा नाद सोडून दुःखशून्य कशी होतील ? पशु, पुत्र, धन, अन्न, पान इत्यादि- कांची भप्राप्ति अथवा वियोग झाला असतां रडणाऱ्या मज मूढाचा 'देहच मात्मा' किंवा 'देहच मी' हा भ्रम कसा जाईल ! मुक्त होण्याची इच्छा अति उत्कट झाली म्हणजे स्वर्गही तृणासारखा तुम्छ वाढू लागतो. खरे या माझ्या मना, विरक्त लोकानी सांगितलेल्या निर्मळ ज्ञान दृष्टी तुझ्यामध्ये कधी येतील का? दुःखरूपी सर्पाचे भोजन होऊन हा तात, अगे भाई, अरे वत्सा, इत्यादि आक्रदन करण्याचा प्रसंग मजवर न येवो! हे बुद्धे भगिनि, मी तुझा भाऊ ना? मग माझा मनोरथ पूर्ण का करीत नाहींस ? तुझे व माझेंही दुःख क्षीण व्हावे, म्हणून मुनींच्या वाणीचा चांगला विचार कर. अग साधि, कन्ये, मते, मी तुझ्या पायां पडून प्रेमाने प्रार्थना करतों की, तूं संसारोच्छदरूपी कल्याणाकरिता अति स्थिर हो व वसिष्ठ मुनींनी वैराग्यादि चार प्रकरणात सुदर दृष्टात देऊन सागितलेल्या ज्ञानाचे स्मरण कर. कारण मनाने कितीही जरी मनन केले तरी निश्चयात्मक मतीने जोपर्यंत त्याचा अंगीकार केलेला नसतो तोपर्यंत तस्व स्थिर होत नाही. यास्तव श्रवणानंतर मनन व मननानंतर निश्चयबुद्धि अवश्य संपादिली पाहिजे. म्हणून हे मते, मी पुनः प्रार्थना करीत आहे १. सर्ग ३-प्रात मानादि, घरी आलेल्या रामादिकांसह वसिष्ठ मुनींचे सभेत जाणे व समेचे स्वास्थ्य. श्रीवाल्मीकि-प्रायः अशाच प्रकारची उदार चिंता करण्यांत रामाची ती रात्र गेली. पहाटे भाकाशाला काही विचित्र शोभा आली. अंधकार व अरुणोदय याच्या योगाने ते पधिमेकडे कपिश व पूर्वेकडे भारक्त झाले. संमार्जित केल्याप्रमाणे, दिशांतील तारा विरल दिसू लागल्या. इतक्यात प्रभात कालचा मंगल पायघोष झाला. त्याबरोबर राजीवनयन राम उठला. दिन जीव या दोषांचाही भविषेच्या पोटी जन्म मालेका बाल्यामुळे येथे भगिनि, मो माहे. शासबन यांच्या प्रसादाने मागून उद्भवलेल्य सतील येथे कन्या मसें पाटो माहे.