५२४ बृहद्योगवासिष्ठसार. करितांच देहधारण करून या लोकी येतात. त्याचे उपदेश हीच शास्त्रे होत. ती ज्ञानसंपादन करण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषाच्या उपयोगी पडतात दुष्कर्मीचा क्षय झाला असता साधकाच चित्त शुद्ध होते व अशा शुद्धचित्त पुरुषाची निर्मल बुद्धि शास्त्रामध्ये प्रवृत्त होते. सच्छास्त्राचा चागला विचार केला असता मनोमोह नाहीसा होतो. क्षीण न झालेले मन मोह मात्र पाडते. ते सिद्धीच्या मुळीच उपयोगी पडत नाही. सर्व जीवाच्या सुख-दुःखाचे कारण हे मनःशरीरच आहे. मासमय शरीर नव्हे. पाचभौतिक मास-अस्तिसघातही मनःकल्पनारूप आहे. भगो, तुझ्या पत्राने मनःशरीराने स्वतःला जसे कल्पिले तसा तो झाला. त्यात आमचा काय अपराध आहे बाबा ? आपल्या वासनेने जीव जे जे कर्म करतो त्याचे त्याला तसेंच फळ मिळते. त्यात दुसन्याचे काही नाही. मनोवासनेनें केवळ अनुसंधानाच्या योगाने एका क्षणात केलेले कार्य आझाला मोठ्या प्रयत्नाने व पुष्कळ वेळानेही करता येत नाही. स्वर्ग, नरक, भोग, जन्म- मरणकल्पना इत्यादि सर्व मनाच्या मननाने निष्पन्न झाले आहे मननरूप मनाचे चलनही मोटे दु ग्वट असते. असो, उगीच अविक बोलून शब्दसंग्रह वाढविण्यात काय अर्थ आहे ? ऊट. तुझा पुत्र जेथे आह तयें जाऊ या, चल. तो चित्तशरीरानेच एका क्षणात सर्व स्वर्गभाग भागून या लोकी आला व विविध उच्चनीच योनीचा मनानेच भोग घेऊन आता समंगेच्या तीरी तप करीत राहिला आहे. असें सागून जगद्गतीला जणू काय हसतच असलेल्या कालाने आपल्या हाताने भृगूचा हात धरला असता भगवान् भृगुही 'अहाहा ! नियतीची व्यवस्था काही विचित्र आहे' असें हळुच ह्मणत उठला. एकाच वेळी उठलेल्या त्या दोघा तेजोनिधींच्या अगकातीने प्रकाशित झालेले अबर. तल रमणीय दिमृ लागले. श्रीवाल्मीकि-वसिष्टमुनि रामाला इतकें सागत आहेत तो सूर्यास्त झाला. त्यामुळे सर्व सभासद सभेतून उठून सायंतन विधि करावयास आपापल्या स्थानी गेले व दुसन्या दिवशी सूर्योदय होताच प्रातःकृत्ये आटोपून पुनः उपदेशामृताचे प्राशन करण्याकरिता मोठ्या आशेने सर्भेत येऊन बसले १३. येथे आठवा दिवस समाप्त झाला.