पान:Sanskruti1 cropped.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मातामहे समांश्रौषीद्राज्यशुल्ममनुसत्तम् ।। (२.९९.२).
 रामाने सांगितलेली गोष्ट खरी मानिली, तर दशरथाने भरत नाही ही संधी पाहून जाणूनबुजून कैकेयीला फसवून रामाला यौवराज्याभिषेक करण्याचा कट केला होता व राम त्यात सामील होता, असे होईल. हा श्लोक प्रक्षिप्त असावा का? त्याला किती किंमत द्यायची? शंभराव्या अध्यायातील जाबालीचे भाषण हे असेच सर्वथैव अप्रासंगिक व विरस करणारे आहे. त्यात जाबाली रामाला व्यवहारी शहाणपण सांगतो. हेही महाभारताचे अनुकरण असावे का?
 राम ऐकत नाही, हे पाहून भरत प्राणांतिक उपोषण करावयास बसला. तेव्हा वसिष्ठ व पौर मध्ये पडले. सर्वांच्या संमतीने असे ठरले की, रामाच्या पादुका सिंहासनावर बसवून भरताने १४ वर्षे राज्यकारभार पाहावा. भरताने बरोबर रत्नजडित पादुका आणल्या होत्या. त्या त्याने रामाला घालावयास दिल्या व नंतर त्या काढून घेऊन स्वतःच्या डोक्यावर धारण केल्या.
 परत प्रश्न उपस्थित होतो. १४ वर्षे बायको व रात्रंदिवस चाकरी करणारा भाऊ घेऊन वनवासात जाणाऱ्या रामाचा त्याग श्रेष्ठ की मिळालेल्या राज्याचा त्याग करून नगरीत तपस्व्यासारखे राहून भावाच्या राज्याचे रक्षण करणाऱ्या भरताचे चारित्र्य श्रेष्ठ ?
 ज्याच्यासाठी प्रतिज्ञा घेतली, तो पिता मेलेला. कैकेयी दीन झालेली. ज्याला राज्य मिळायचे, तो ते घ्यायला तयार नाही. म्हणजे प्रतिज्ञा केलेली सगळी कारणे नाहीतशी झाली, तरी प्रतिज्ञेला चिकटून राहण्यात रामाने काय साधले? भीष्माच्या वेळीही मी हाच प्रश्न काढला होता. प्रश्नाचा रोख रामावरही नाही की भीष्मावरही नाही, तर 'नैतिक मूल्ये कशावर अवलंबून रोख असावीत? नैतिक वर्णन केवळ स्वसापेक्ष व परनिरपेक्ष असावे का?' असा प्रश्न आहे. याचे उत्तर फारच गुंतागुंतीचे, अर्धवट 'होय' व अर्धवट 'नाही' असे. आहे. त्या प्रश्नाचा विचार येथे करण्याचे कारण नाही. पण माझ्यापुढे आलेला विचार इतरांना सांगावा, म्हणून येथे निर्देश केला आहे. 'टू हॅव द केक अँड ईट इट टू' असा वाक्संप्रदाय इंग्रजीत आहे. 'केक खायचीपण.

३४

।। संस्कृती ।।