Jump to content

पान:Sanskruti1 cropped.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कबूल केल्यानंतर कवट्यांची मापे सतरा पिढ्यांपूर्वीचा पुरुष रजपूत होता की नव्हता, हे सिद्ध करू शकत नसतात, असिद्धही करू शकत नसतात. एके ठिकाणी बाईंनी हिंदूंची षड्दर्शने म्हणून बौद्ध, जैन, चार्वाक, वैदान्त यांचा उल्लेख केला आहे (हिन्दू सोसायटी, पृ. ९८) हा उल्लेख उघड चुकीचा आहे. कारण बौद्ध, जैन, चार्वाक ही जरी दर्शने असली, तरी त्याचा समावेश हिंदूंच्या षड्दर्शनांत नाही. आणखी एके ठिकाणी बाईंनी म्हटल, - उत्तरेच्या महाराष्ट्रीय राज्यकर्त्यांनी उत्तरेकडून होणारे आक्रमण थापाव हे निर्विवाद. ही भूमिका चुकीची आहे. कारण उत्तरेतील मराठ्यांच्या राजवटा उत्तरेकडून होणारे आक्रमण संपल्यानंतरच्या आहेत. अशा स्थूल, अशास्त्रीय विधानांचा उगम आपण हुडकू गेलो, " असे दिसते की, बाईंचे इतिहासाचे ज्ञान फार स्थूल आहे. बौद्धधमा तत्त्वज्ञानाचा आणि भारतीय तत्त्वज्ञानाचाही त्यांचा परिचय फार भयो आहे. एकेकाळच्या मातृसत्ता आणि तंत्रपरंपरा यांचे समाजरचनेतील स्था त्यांना फारसे जाणवत नाही. बालविवाहासारख्या चाली जाति टिकविण्यात कोणता भाग घेतात, हे त्यांना जाणवलेच नाही. एका म परिघाच्या बाहेर बाई वावरू लागल्या म्हणजे त्या फार ढोबळ विधा लागतात. अगदी साध्यासाध्या गोष्टींमध्ये चका करितात. एके ठिकाणी विचारितात 'महाराष्ट्रात मराठी जेत्यांची भाषा म्हणून आली का प्रश्न विचारणेच चुकीचे आहे. कारण मराठीचा उगम इ. स. १००० फार जाणार नाही, आणि महाराष्ट्र मात्र त्याच्या कैक शतक वसतीचा भाग आहे. प्रश्न संस्कृत ही भाषा जेत्यांची भाषा म्ह' काय?' असा विचारावयाला पाहिजे, आणि त्याचे उत्तर तितक, निर्विवादपणे होकारार्थी आहे; कारण संस्कृत ही महाराष्ट्रात जमा नव्हे. नाही. एका मर्यादित त्या फार ढोबळ विधाने करू त. एके ठिकाणी त्या हणून आली काय?' हा स. १००० च्या मागे *क शतके आधीच्या षा म्हणून आली तितकेच स्पष्टपणे, हाराष्ट्रात जन्मलेली भाषा अतिशय शास्त्रशुद्ध व सूक्ष्म आणि अतिशय ढोबळ आणि अशा दोन थर बाईंच्या लिखाणात इतक्या चमत्कारिकपणे । आहेत की, कोणता थर कुठे संपतो, हे ओळखणेसुद्धा पुष्कळ६ आणि अशास्त्रीय हे 'सळ झालेले १३६ ६ पुष्कळदा कठिण ।। संस्कृती ।।