पान:Sanskruti1 cropped.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उलगडा त्यांचाच आहे. त्या व्यवस्थेचे पुरेसे विवरण त्याआधी उपलब्ध नव्हते. हा व्यापक आढावा समाजरचनेच्या कोणत्या सूत्रांपर्यंत घेऊन जातो, याचेही विवेचन त्यांनी केले. बाईंनी भारतातील नातीगोती आणि सोयरसंबंध यांचा जो विचार केलेला आहे, तो या पद्धतीचा नुसता पहिलाच विचार नाही; तर तो पहिलाही आहे. आता अधिकृत व प्रमाण म्हणून मान्यही ठरला आहे आणि हळूहळू हिंदूंच्या समाजरचनेच्या नव्या स्पष्टीकरणाचा हा ग्रंथ जन्मदाताही ठरण्याचा संभव आहे हे लक्षात घेतले, तर समाजशास्त्रीय लिखाणात इरावतींच्या लिखाणाने एक नवा कालखंड सुरू झाला आहे, हे लक्षात येणे फारसे कठीण जाऊ नये. । हटनने असे म्हटले आहे की, समाजशास्त्रात शारीरिक रचनाविवेचनशास्त्र आणि सामाजिक-सांस्कृतिक विवेचनाचे शास्त्र असा दुहेरी अधिकार ज्या फार थोड्या संशोधकांच्या ठिकाणी आहे, त्यांपैकी इरावतीबाई या एक आहेत. एकेका विभागाच्या तज्ज्ञतेच्या त्या काळात तज्ज्ञता आणि चौरसपणा चाचा दुर्मिळ संगम इरावतींच्या ठिकाणी झाला होता, हे हटनला अभिप्रेत असणारे एक सत्य दिसते. आपल्या पिढीला अज्ञात असणा-या नवभारताच्या पजागृतीच्या प्रतिनिधी बाई आहेत, असेही हटनला वाटते. सहजगत्या " उल्लेख करून जातो की, ठळकपणे नजरेत न भरणा-या पण समाजाच्या Cनला कारक ठरणा-या बाबींवर भर देण्याची लेखिकेची पद्धत आहे. | हटनने उल्लेखिलेला हा मुद्दा हा इरावतींचे वैचारिक लिखाण वाचताना विचारात घेण्याजोगा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ठळक बाबी ठळकपणे संवानाच दिसतात. जे ठळकपणे दिसते ते सत्य नसतेच, असे म्हणण्याचे कारण नाही; पण जे ठळकपणे दिसत नाही, ते अधिक महत्त्वाचे सत्य पाचा संभव असतो. ठळकपणे न दिसणा-या पण अधिक मूलभूत णा-या सत्यकणांचे दर्शन घडविण्यासाठीच त्या त्या शास्त्रातील विचारवंतांची खरी गरज असते. ठळक बाबींवर भर देणा-यांनी केलेल्या चाडचुका व त्यांचे राजकीय परिणाम पाहिले, म्हणजे असे वाटू लागते की, चाइनी ठळक नसणा-या बाबींकडे लक्ष वेधण्याची जी धडपड केली, तीच ।। संस्कृती ।। १२७