शक्य तितक्या वाईट रितीने वापरणे, वाचनालयांतील पुस्तकांची पाने फाडणे व शक्यतर पुस्तकेच लांबविणे, बसेस व आगगाड्या ह्यांतील सामानाची शक्य तितकी नासधूस करणे, शाळा, कॉलेज व वसतिगृहे यांतील बाके मोडणे, देवळाच्या आवारात गायी, शेळ्या, गाढवे, कुत्री मोकाट सोडून त्याचा उकिरडा बनविणे, ह्या गोष्टी पाहिल्या म्हणजे सार्वजनिक संपत्ती निर्माण झाली, तरी तिचा उपभोग घ्यावयाला लागणारी संस्कृती आपल्यात आधी निर्माण केली पाहिजे, हे ध्यानात येते. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञानार्जन नसून संस्कृतीची जोपासना, उपभोगाची पात्रता आणण्याची अभिरुची व सामाजिक मूल्यांचे परिशीलन ह्या गोष्टी शिकविण्याची संधी आहे, हे लक्षात येईल. संस्कृतिसंपन्न जीवनात व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मर्यादा पडतात. सामायिक संपत्ती निर्माण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. बंधुता म्हणजे दुस-याबद्दल सौजन्य, करुणा व आत्मीयतेची भावना. ती असल्याशिवाय खरी समेत प्रस्थापित होणेच शक्य नाही. ह्या सौजन्याचा आविष्कार रोजच्या जीवना झाला पाहिजे; फक्त संकटकाळी किंवा विपत्काळी नाही. देवाणघेवाण, यांनी मला केलेले जे आवडणार नाही ते मी दुस-याला करणार नाc" स्वतःवर अन्याय सहन करणार नाही, दुस-यांवर होऊ देणार नाही, अ" भावना असल्याशिवाय समता नांदणार नाही. ज्या समाजात नागराज आहे, यंत्रांच्या द्वारे उत्पादन होते, सार्वजनिक मालमत्ता निर्माण होत, अ" समाजात समता टिकवावयाची, तर वरील तत्त्वाला पोषक अशा आचार" कसोशीने पालन करावे लागते. नुसती समाजकल्याणकारी तत्त्व " असून चालत नाही. त्याबरहुकूम आचार बहसंख्य लोकांनी ठेविला " धर्म हे 'मनोपुब्बंगम' असले, तरी आचारप्रधान आहेत, हे विसरून जा नाही. हे विसरून चालणार | समानता हे तत्त्व जरी एक महत्त्वाचे मूलगामी तत्त्व मानिल, सार्वकालिक होईलच, असे सांगता येत नाही, अशा काही विपत्ती समाज त्व मानिले, तरी ते ही विपत्ती समाजावर ११८ ।। संस्कृती ।।
पान:Sanskruti1 cropped.pdf/121
Appearance