पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२९]

म्हणूनच प्रत्येक देशाने शेतकी, कारखाने, व्यापार या सर्व औद्योगिक अंगांची प्रगति केली पाहिजे, व ही प्रगति घडवून आणण्यास संरक्षक पद्धतीचा अंग र केल्याखेरीज गत्यंतर नाही. लिस्टच्या मताप्रमाणे समा जाचे किंवा राष्ट्राचे बाल्यावस्थेत अनियंत्रित व्यापार असावा. कारण अशा व्यापाराने सुधारलेल्या देशांतून कलाकौशल्याचे जिन्नस देशांत येतात, व त्यांचा लोकांत प्रसार होतो, व ह्यायोगाने  लोकांची अभिरुची परिणत होते व वासना व गरजा जास्त वाढतात. असे झाल्यानंतर संरक्षणपद्धतीचा अवलंब केला पाहिजे म्हणजे देशांत लोकांच्या नवीन वाढलेल्या गरजा, वासना व अभिरुची यांच्या तृप्तीसठी कारखाने निघू लागतात व असे वाल्यावस्थेतील कारखाने पूर्ण वाढ झालेल्या कार- खान्याच्या मालाशी बरोबरीच्या नात्याने टक्कर देऊ शकत नाहींत. व म्हणून याकाळीं देशांत संरक्षणपद्धतीचा अंगीकार केला पाहिजे. सर्व ग्रंथांची पूर्ण वाढ झाल्यावर व आपल्या देशांतील कारखाने दुसऱ्या देशांशी टक्कर देण्यास समर्थ झाले म्हणजे मग पुनः अप्रतिबंधव्यापारपद्धति सुरू केली पाहिजे. कारण, माल उत्तम होण्यास व त्याची किंमत कमी होण्यास चढाओढ अवश्यक आहे. अशी चढाओढ नसल्यास व आपलें गिऱ्हाईक कायम आहे अशी कारखानदारांस खात्री असल्यास सुधारणा करण्याची प्रवृति कमी होण्याचा फार संभव असतो. लिस्टच्या मतें सर्व युरोपांत इंग्लंड मात्र या शेवटल्या स्थितीप्रत आल्यामुळे तेथे अप्रतिबंध व्यापारतत्व फायद्याचें आहे; परंतु जर्मनीला संरक्षण अवश्यक आहे.
 लिस्ट याला सर्व जर्मनीच्या संस्थानांचे एक राष्ट्र व्हावें अशी फार इच्छा होती. व त्याच्या संरक्षक पद्धतीचा एक हेतु राष्ट्रीय ऐक्य घडवून आणणे हा होता. कारण संस्थानासंस्थानामधील जकाती काढून सर्व जर्मनीभर अप्रतिबंध व्यापार सुरू करावा व परराष्ट्रांशी मात्र संरक्षण पद्धतीचा अवलंब करावा असे त्याचे म्हणणें होते, व त्याचे लेखांनी जर्मनी च्या राष्ट्रीय घटनेस फारच मदत झालेली आहे असें जर्मन इतिहासकार म्हणतात
 ऐतिहासिक पद्धतीचा व समाजशास्राचा जनक फ्रच तत्वज्ञानी कोम्ट् हा होता. याच्या ग्रंथांनीच ऐतिहासिक पद्धतीला प्रथमतः महत्व आलें व त्याच्या प्रोत्साहनानें अर्थशास्त्रांतला ऐतिहासिक पंथ अस्तित्वांत आला.