पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१८१]

याही कृषिपद्धतीचा मुख्य दोष ह्मणजे शेतीच्या लागवडीची हयगय होय. दासकल्पशेतक-यांना मालकाच्या शेतावर अंग मोडून मोठ्या कळकळीनें किंवा मोठ्या हुरूपानें काम करण्याची बुद्धि होणें मानवी ‘स्वभावाप्रमाणें अशक्यच होतें. कारण अधिक काळजीनें काम केल्यास किंवा कमी काळजीनें काम केल्यास त्यांना सारखेंच होतें. अगदीं गुलामाप्रमाणें यांची स्थिति नव्हती हें खरें आहे. आपल्या जमिनीच्या तुकड्याची चांगली मशागत केल्यास त्यांचें त्यांत कल्याण होण्यासारखें होतें. परंतु ऐनकामाच्या वेळीं धन्याच्या शेतावर कामावर जावें लागल्यामुळें आपल्या शेताकडे विशेष लक्ष देण्यास त्यांना सवड सांपडत नसे. यामुळे दासकल्पशेतक-यांकडून दोन्ही शेतांची हयगय होई. एक दुस-याचें शेत म्हणून, व आपल्या शेतावर काम करण्यास पुरेसा वेळ नाहीं ह्मणून; शिवाय या पद्धतींत धन्याकडूनही देखरेख चांगली होण्याची आशा नसते, कारण यांना शेती करणें हें कमीपणाचें वाटत असे. यामुळें बहुतेक दासकृषीप्रमाणेंच या पद्धतीचे दोष असत; मात्र दगडापेक्षां वीट मऊ एवढाच काय तो फरक.
 परंतु दासकल्पकृषीचा देशांतील एकंदर मजूरवर्गावर फारच अनिष्ट परिणाम होतो. दासकल्प शेतकरी हे धन्याच्या शेतावर रडतराऊप्रमाणें कामाला आल्यामुळें तें काम ते रेंगाळत, थबकत व अत्यंत हलगर्जीपणानें करीत. परंतु यांच्या उदाहरणानें दुसरे मजूर यांनाही तचि संवय लागे. ह्मणून जेथें जेथें दासकल्पकृषि प्रचलित आहे तेथें तेथें एकंदर मजुरांची कर्तबगारी व कार्यक्षमता फारच कमी असते असा अनुभव आहे. कारण अशा ठिकाणच्या मजुरांमध्यें कर्तव्यदक्षता, चलाखी, हुरुप वगैरे गुणांचा अभाव दिसून येते. अर्थात् याचा उद्योगधंद्यावर अनिष्ट परिणाम होतो; कारण अशा मजुरांनीं केलेलें काम वाईट होतें इतकेच नाहीं तर त्यावर खर्चही अनिवार होतो.दासकल्पकृषिमध्यें शेताचें उत्पन्न फार कमी होतें व या पद्धतींत शेतकीची सुधारणा होण्याचा संभव फारच कमी असतो. दासकल्प शेतक-यांना मालकाच्या शेतावर ऐनवेळीं कामास जाणें मोठ्या जीवावर येतें व या जाचांतून आपण सुटूं तर बरें असें त्यांस होतें. कारण मग त्यांना आपल्या शेताकडे लक्ष देण्यास सांपडतें.
 धन्याच्या कामावर दासकल्प शेतक-यांना बोलाविण्याच्या युरोपां- -