पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२६ ) च्या कारकीर्दीत त्याच्या मूर्खपणामुळे इंग्लिशांच्या कित्येक वसाहती त्यांच्या हातून गेल्या; व त्या वसाह तींचेंच तेव्हांपासून "युनाय्तेद स्त्स" हें राष्ट्र बनले. ह्या वसाहती त्यांच्याहातून कशा गेल्या त्याबद्दलचा इतिहास, इतःपर अशी गोष्ट न होण्यासाठी कशा रीतीनें सावधगिरी ठेविली पाहिजे, हे समजण्यासाठी लक्षपूर्वक ध्यानांत ठेवण्यासारखा आहे; व म्हणून या विषयाच्या चर्चेपासून जरी ब्रिटिश लोकांच्या मनास दुःख होणार आहे, तरी तसे करणें अवश्य आहे. तेव्हां प्रश्न असा उप्तन्न होतो की, ह्या वसाहती त्यांच्या हातून जाण्याचे कारण काय? प्रथमतः ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे की, पहिला चार्लस राजा ह्याच्या कारकीर्दीत उत्तरेच्या बाजूम ज्या वसाहती स्थापिल्या गेल्या, त्यांपैकी बहुतेक वसाहतींचा इंग्लंदाशीं विशेष स्नेहभाव कधीच नव्हता. दुसरा चार्लस ह्याच्या कारकीर्दीच्या आरंभीच त्या वसाहतींनीं उघड- पणे सांगितलें कीं, इंग्लंदाशी आमचा संबंध शिष्टाचारा- पुरताच आहे; खरा कळकळीचा संबंध कांहीं नाहीं. अशो खरी स्थिति होती तर ह्या वेळेपर्यंत तरी त्यांनी इंग्लंदा- शीं निकट संबंध कां ठेविला होता, असा प्रश्न सहजच उत्पन्न होतो. ह्याचें उत्तर इतकेंच कीं, फ्रेंच लोक आप- णांवर हल्ला करितील की काय अशी त्यांना भीति होती, व म्हणूनच त्या वसाहती इंग्लिशांच्या तंत्राने चालत अमेरिकेंतील वसाहती ( युनाय्तेद स्वेत्स ) इंग्रजांच्या हातून जातात.