Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२२) देशांतील लोकांच्या वसाहती व फ्रेंचांच्या वसाहती ह्यां- ना इंग्लिशांविरुद्ध एकत्र होऊं न देणे. ÷ युत्रेच येथे १७१३त तह होऊन हे युद्ध संपले. लिबरल पेक्षा हे युद्ध सुरू केले होतें; व कान्सरव्हेटिव्ह पक्षानें हा तह करून ते बंद केले; म्हणून ह्या तहांतील कलमें आपणांस फार लज्जास्पद आहेत, अशी ओरड लिबरल पक्षाने केली होती. आतां ह्या तहापासून इंग्लिशांस काय फायदे झाले, ते माहू. ( १ ) जाकोबाइट ह्यांना (स्टयूअर्ट घराण्यातील राजांचा पक्ष घेणाऱ्या लोकांना ) कित्येक वर्षेपर्यंत फ्रेंचांकडून मदत होणे अशक्य झालें. ( २ ) फ्रान्सच्या व स्पेनच्या वसाहतींना इंग्लिशांविरुद्ध एकी करितां आली नाहीं. [३] इंग्लिश वसाहतींना क शाचेंहि भय राहिलें नाहीं. [ ४ ] ज्यांना हल्लीं नोवा स्कोशिया व न्यू ब्रन्विक म्हणतात, ती त्यांना एकत्र करितां आलीं; व न्यूफौंडलंड त्यांच्या ताब्यांत आलें. [५] भूमध्य समुद्रांतील मिनोर्का व जिब्राल्तर ही ठिकाणें त्यांस मिळाली. [६] गुलामांचा सर्व व्यापार त्यांच्या हाती आला; व स्पेन देशांतील लोकांच्या वसाहतींस प्रतिवर्षी एक जहाज व्यापारासाठी पाठविण्याचा हक्क त्यांस मिळाला. ह्यानंतर स्पेन देशाशी इंग्लिशांची युद्धे झाली. त्या लोकांनी इंग्लिशांच्या वसाहतींतील लोकांशी तंटे बखेड केले हे ह्या युद्धाचें एक कारण होतें; व ते लोक आपल्या वसाहतींतील लोकांना इंग्लिश वसाहतींतील लोकांशी व्या- ÷ हे ठिकाण आमस्तर्दामच्या आमेयीस २१ मेल वर आहे,