पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२० ) होतें, व त्या सर्व कुटुंबाच्या चरितार्थाचा बोजा त्याच्या- वरच होता. आतां त्याने काय करावें बरें ? त्यानें असें केलें; पैसा कर्जी काढिला; व तो पैसा त्या दुसऱ्या लोकांस देऊन त्यांच्यापासून ते जमिनीचे तुकडे त्यानें विकत घेतले. ह्याचा परिणाम असा झाला कीं, कांहीं काळपर्यंत त्याच्या शिरावर त्या कर्जाचा बोजा पडला; परंतु तें कर्ज फेडण्याची त्याला उमेद होती. ह्याप्रमाणें ते फेडल्यानंतर त्याला असे आढळून येईल की, आप- णास उत्तम प्रकारचें वतन मिळाले आहे, व आपण पेक्षां फार श्रीमान् झालो आहों. आतां हेच उदाहरण विशेष मोठ्या प्रमाणावर ध्यानांत आणावें, व त्याप्रमाणेच इंग्लिशांनी हुबेहुब के लें, असे समजावें, आपल्या वतनाचे ( वसाहतींचे ) तुकडे होतील, अशी त्या काळी त्यांना मोठी भीति होती, त्यांचे कुटुंबहि मोठें होतें ( इंग्लंदांतील सर्व लोक हेंच कुटुंब व तेथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे ह्या वाढणाऱ्या लोकसंख्येच्या चरितार्थाची कांही तजवीज होणें जरूर होतें. ) ; आणि हं वतन एकत्र राखण्यासाठी व ते वाढविण्यासाठी त्यांनी पुष्कळ पैसा खर्च केला व कर्जीह काढिला. तेव्हां राष्ट्रदृष्ट्या ह्या जमाखर्चाचा विचार करणे म्हणजे जमेच्या व खर्चा च्या सदरांची तुलना करून एकंदरीत आपला नफा झाला किंवा तोटा झाला, इतकं पाहणें हें आहे.