पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४४)

ह सादृश्य अगढ़ीं लागू पडत नाहीं. इंग्लिश लोकांच्या पूर्वजांची त्या काळी अशी खातरी झाली नव्हती, म्हणून त्यांना हें सादृश्य कदाचित् योग्य वाटलें असेल. तेव्हां असें गृहित वेतां येईल कीं, वसाहतींचें जें राज्य इंग्लि- शांच्या हातीं हल्लीं आहे, तें त्यांचें शेवटचेंच होय; आणि हें जर का त्यांनी आपल्या हातून गमाविलें, तर तिसरा जार्ज व त्याचे स्नेही ह्यांनीं युनायतेद स्तेत्स गमाविलें, त्या वेळी जसें वसाहतींचें नवें राज्य त्यांना पुन्हां स्थापि- तां आलें, तशा प्रकारचें वसाहतींचें नवीन राज्य स्थाप- ण्याची संधी त्यांना सांप्रत मिळावयाची नाहीं.

 आतां लहान मुलांच्या सादृश्याकडे वळू; आणि त्या सादृश्यानें तरी वसाहतींचा व मूळ देशांचा संबंध अधिक खऱ्या रीतीनें ध्यानांत येतो की काय ते पाहू. प्राचीन काळीं एकंदरींत हें सादृश्य बरेंच लागू पडलें असतें, ही गोष्ट निर्विवाद आहे. अगदी अलीकडील काळापर्यंत आपल्या वसाहतींना आपल्याच मर्जीप्रमाणे वागविण्याची सवय मूळ देशांस होती. जसा जसा काळ लोटत गेला, तस तसें ह्या प्रतिबंधाबद्दल वसाहतींना वैषम्य वाटू लागले; म्हणून मूळ देशांपासून त्यांनी आप- ला संबंध अजिबात तोडून टाकिला. युनायूतेद स्तेत्स, चिली आणि पेरू ह्यांचा इतिहास अशाच प्रकारचा आहे. अमेरिकेतील स्वातंत्र्याच्या लढाईपासून (युनातेद स्तेत्स इंग्लंदापासून स्वतंत्र झाले तेव्हांपासून ) इंग्लिश