पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डीलधारी माणसे त्याच्याकडून निरनिराळी कृत्ये करून घेत असतात, व न्याला शाबासकी अगर शिक्षा देत असतात. संस्कृतीचे एका पिढीकडून दुसरीकडे संक्रमण होते ते ह्याच मार्गाने. लहानपणी सामाजिक आचार आत्मसात होतात. त्या वेळी त्या आचारांमागे कारणपरंपरा काय आहे हे माहीत नसते, व जाणण्याची शक्ती नसते. भोवतालच्या आचाराविचारांशी समरस होण्याने जीवन सुकर होते; व ते तसे करण्याची वृत्ती लहान मुलांत दिसून येते. लहानपणी आत्मसात केलेल्या आचारविचारांभोवती तीव्र भावनांचे वलय असते. अमके चांगले, तमके वाईट, अमके मंगल, तमके अमंगल, अमके आदरणीय, तमके गर्य, अमके शास्त्रीय, तमके अशास्त्रीय अशी मत ठाम बनलेली असतात. आपले आचारविचार योग्य, इतरांचे तसे नव्हेत; एवढेच वाटून थांबत नाही; तर आपले ते नैसर्गिक इतरांचे ते विकृत, अशीही दृढ भावना होते. रोज स्नान करणे हा आचार स्वच्छतेचाच नव्ह, तर मांगल्याचा निदर्शक आहे, असे आपल्याला वाटते. जगातील कित्य प्रदेशात पाण्याच्या अभावी किंवा थंडीच्या प्रभावामुळे हा आचार पाळ शक्यही नसते व इष्टही नसते. तिबेटातील पवित्र व आदरणीय समज जाणारे, मांगल्याची मूर्ती असे धर्मगुरू लामा कधी आंघोळ करितात . नाही, परमेश्वरालाच ठाऊक! आपले वेदकालीन पूर्वजही आंघोळीला का महत्त्व देत असत, असे नाही. लामणदिवा, निरांजन, उदबत्ती ही आप मांगल्याची प्रतिके समजतो. रॉकेलचा दिवा किंवा विजेचा दिवा आप मंगलकारक समजत नाही. थोडा विचार केला, तर लक्षात येईल की, राक किंवा वीज माहिती होण्याआधी पिढ्यानपिढ्या निरांजन व लामणा देवघरात व मुंजीच्या, लग्नाच्या व इतर प्रसंगी आपण लाविलेला पााल आहे; येथे बुद्धीपेक्षा भावनेचाच भाग जास्त आहे. देवापढे तुपाचा पर लावायचा, हविर्द्रव्य तूपच असावे, हे आचार वेदकालीन पूर्वजांकडून आ आहेत. आजही उत्तरेकडे थंड प्रदेशात राहणा-या लोकांना वनस्प तेले माहीत नाहीत. सर्व लौकिक व दैनिक व्यवहार प्राण्या गाकडून आलेले मिळणा-या आज्य (शेळीच्या दुधाचे तूप), धृत व इतर घरमा लोकांना वनस्पतिजन्य व्यवहार प्राण्यांपासून इतर चरबी ह्यांवरच || संस्कृती। ७०