“हे चंचलनयने तरुण, तूं हें अपूर्व चौर्यकर्म कोठें शिकलीस? की ज्याचे योगानें भरदिवसा जाग्रत अशा पुरुषांचे चित्त तूं सहज हरण करून नेतेस. ६४ अपर्व चौर्यमभ्यस्तं त्वया चंचललोचने || दिक्षैत्र जाग्रतां पुंसां चेतो हरास दूरत ॥ २७ ॥ "" 66 हरे: पदाइति: लाया न लाध्यं खररोहण | स्पर्धापवियुक्ता न युक्ता मूर्खमित्रता ॥३८॥ "सिंहाचा लताप्रहार बरा, पण गर्दभावर आरोहण करणेहि निंद्य होय. जे सूज्ञ आहेत त्यांच्यांशी वैर असले तरी पतकरतें, पण मूर्खा चा स्नेहहि बाईट. " " व्रजंति पद्मनि कदा विकास । प्रिया गते भर्तरि कि करोति ॥ रात्रौत्र नित्यं विरहाकुला का । सूर्योदये रोदिती चक्रकी ॥ ३९ ॥ हा लोक अंतलपिकेंतील आहे. याच्या तीनहि चरणांतील प्रश्नांची उत्तरें शेवटल्या चरणांत अनुक्रमानें दिली आहेत- “ कमलें केव्हां प्रफुल्लित होतात ? (सूर्योदये) सूर्योदय झाला असतां, पति गत झाला असतां स्त्री काय करते ? (रोदिति) रडते, व रात्रीचे ठायीं नित्य विरहानें पीडित कोण असते ? चक्रचाकी, चक्रवाक पक्षांचे मिथुनाची सर्वत्र प्रसिद्धी आहेच." जामाता जठरं जाया जातवेदा जलाशयः ॥ परिता नैष पूर्यते जकारा: पंच दुर्भ: ॥ ४० ॥ जामाता ( जांबई ), जठर (पोट), जाया (स्त्री), जातवेद (अग्री), ● आणि जलाशय, हे पांच जकार दूर्भर होत. ह्मणजे यांची पूर्तता कधीं होतच नाहीं. " -
पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/६८
Appearance